हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. असंही मोदी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेणाऱ्या या महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला बळ देणारा अर्थसंकल्प आहे. देशातील ग्रामीण गरीब शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत.This budget will take villages poor and farmers on the path of prosperity PM Modi
नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे, हा अर्थसंकल्प म्हणजे त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे, तरुणांना असंख्य नवीन संधी देणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प शिक्षण आणि कौशल्याला नवा परिमाण देईल, मध्यमवर्गीयांना नवे बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, आदिवासी समाज आणि दलित मागासवर्गीयांच्या सक्षमीकरणाच्या भक्कम योजना घेऊन आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प महिलांचा आर्थिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मदत करेल, हा अर्थसंकल्प लहान व्यापारी आणि लघु उद्योगांच्या प्रगतीला नवीन मार्ग देईल. बजेटमध्ये उत्पादन आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी चालना मिळेल आणि गतीही कायम राहील, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अभूतपूर्व संधी वाढतील, असे पंतप्रधान म्हणाले.
This budget will take villages poor and farmers on the path of prosperity PM Modi
महत्वाच्या बातम्या
- BCCI सचिव जय शहा यांची घोषणा; ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना 8.5 कोटींची मदत, 117 भारतीय खेळाडू सहभागी होणार
- Pushkar Singh Dhami : अग्निवीरांसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने केली मोठी घोषणा
- US Elections : बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया
- एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!