जाणून घ्या, बिहारमधील दरभंगा येथे काय म्हणाले?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारमधील दरभंगा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काँग्रेस आणि ‘आरजेडी’वर धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हे लोक देशाची एकता भंग करण्यासाठी काहीही करू शकतात.”These people can do anything to break the unity of the country Modis target on Congress
पंतप्रधान मोदी सभेत म्हणाले की, “जेव्हा अयोध्येत रामल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, आता भारत येत्या 1000 वर्षांचे भविष्य लिहिणार आहे कधी कधी इतिहासातील एकच घटना अनेक शतकांचे भवितव्य ठरवते. 1000 वर्षांपूर्वी जेव्हा भारतावर पाश्चिमात्यांकडून आक्रमणे होऊ लागली, तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की भारत एक हजार वर्षे गुलामगिरीत अडकेल. देशाला दिशा दाखविणाऱ्या बिहारला अशा संकटांनी घेरले होते की सर्व काही उद्ध्वस्त झाले होते, पण भारताच्या नशीबाने पुन्हा एकदा कलाटणी घेतली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, २१व्या शतकातील हा काळ आहे, जेव्हा भारत पुन्हा सर्व बंधने तोडून उभा राहिला आहे. आज जगात भारताची विश्वासार्हता एका नव्या उंचीवर आहे. आज भारत चंद्रावर अशा ठिकाणी पोहोचला आहे जिथे याआधी कोणीही पोहोचले नव्हते. 10 वर्षांपूर्वी आपण जगातील 11वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो, फक्त 10 वर्षात आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत.
पीएम मोदींनी तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “जसा दिल्लीत राजकुमार आहे, तसाच पटणामध्येही राजकुमार आहे. एकाने संपूर्ण देश आणि दुसरा संपूर्ण बिहार ही आपली मालमत्ता मानली आहे. दोघांचे रिपोर्ट कार्डही सारखेच आहे. त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये घोटाळ्याशिवाय काहीही नाही. बिहारमध्ये किती मोठा अपहार झाला आणि तिजोरीची लूट झाली, मुली घर सोडायला कशा घाबरतात. नोकरी देण्यापूर्वी जमीन कशी घेतली गेली. हे आठवा.