• Download App
    केंद्र सरकारच्या बेजबाबदार पणामुळे दुसऱ्या लाटेत लोकांना जीव गमवावा लागला ; सोनिया गांधी | The irresponsibility of the central government led to the loss of lives in the second wave; Sonia Gandhi

    केंद्र सरकारच्या बेजबाबदार पणामुळे दुसऱ्या लाटेत लोकांना जीव गमवावा लागला ; सोनिया गांधी

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एका हिंदी दैनिकात दिलेल्या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ‘हम कैसे भूल जाएंगे ओ दौर’ या लेखामध्ये त्यांनी कोरोना काळामध्ये सरकारने केलेल्या हलगर्जीपणाबद्दल केंद्र सरकारला चांगलेच सुनावले आहे. मोदी सरकारने कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान दाखवलेल्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळेच अनेक लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला होता आणि हे खूपच दु:खद आणि दुर्दैवी धोरण केंद्र सरकारने अवलंबले होते. असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

    The irresponsibility of the central government led to the loss of lives in the second wave; Sonia Gandhi

    त्याचप्रमाणे त्या म्हणतात, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट पीकवर होती तेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते. आणि जेव्हा कोरोनाची दुसरी लाट गेली त्यानंतर ते पुन्हा समोर आले. सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे सातत्याने लोकांचे जीव जात होते. इतका वेळा इशारा देऊनही एखादं सरकार इतके कसे काय निष्क्रिय राहू शकते असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


    बिल्डरच्या घशात महाविद्यालयाची जागा तरीही शिक्षणमंत्र्यांकडून दखल नाही, कॉाग्रेसच्या सरचिटणिसांनी सोनिया गांधींकडे केली वर्षा गायकवाड यांची तक्रार


    भारताने 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पण यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरण्यास साफ नकार दिला आहे. हे शास्त्रज्ञ, नर्सेस, डॉक्टर यांचे क्रेडिट असून नरेंद्र मोदी हे फक्त इव्हेंट मॅनेजमेंटची संधी प्रत्येक गोष्टींमधून शोधत असतात. अशी टीका करत नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी दोन कोटी लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. मग हे रोज का नाही होऊ शकत? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

    The irresponsibility of the central government led to the loss of lives in the second wave; Sonia Gandhi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू