• Download App
    कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली आयुष्यातील पहिली वहिली कार, किंमत तब्बल एक कोटी रुपये|The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केली आयुष्यातील पहिली वहिली कार, किंमत तब्बल एक कोटी रुपये

    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आयुष्यातील पहिली वहिली कार खरेदी केली आहे तीदेखील तब्बल एक कोटी रुपयांची. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यावर त्यांना वाहनाची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी टोयाटो व्हेलफायर ही सात आसनी आलिशान मोटार खरेदी केली आहे.The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    येडीरुप्पा यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते मानसिक तणावात होते. त्यामुळे ते कुटुंबासहित मालदवीमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेले होते. परत आल्यावर त्यांनी ही कार खरेदी केली आहे.



    आत्तापर्यंत येडीयुरप्पा यांना स्वत:च्या कारची गरज नव्हती. मुख्यमंत्री किंवा विरोधी पक्षनेते या नात्याने शासकीय वाहनांचा वापर ते करत होते. गरज पडल्यास मुलगा बी.वाय. विजयेंद्र यांची कारही ते वापरत होते. २०१८ च्या निवडणुकीतल प्रतिज्ञापत्रानुसार येडीयुरप्पा यांच्याकडे कोणतेही वाहन नव्हते.

    येडीयुरप्पा यांनी खरेदी केलेल्या टोयाटा वेलफायरची किंमत 87 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. करांसह किंमत एक कोटी रुपये झाली आहे.येडीयुरप्पा १९८० च्या दशकापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवमोगा जिल्ह्यात ते सायकलवर फिरत असत. त्यावेळी कर्नाटक विधानसभेत त्यांच्यासह भाजपचे फक्त दोन आमदार होते. सायकलवरून फिरणाऱ्या येडीयुरप्पा यांची त्या काळात चांगलीच चर्चा होती.

    The former Chief Minister of Karnataka bought the first car in his life, priced at Rs one crore

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे