विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना टिपण्यासाठी लष्कराने नवी रणनीती आखली आहे. जंगलात नव्हे तर गावात खाण्यापिण्यासाठी आल्यावर टिपणार दहशतवाद्यांना टिपले जाणार आहे.दहशतवाद्यांना खेड्यापाड्यात खाण्यापिण्यासाठी येऊ द्या, मग त्यांना लक्ष्य करा. जंगलात लढण्यासाठी संयम आवश्यक आहे.The army’s new strategy to pick up terrorists in Kashmir will pick up when they come to the village to eat and drink
सैनिकांना सतर्क राहण्यास आणि दहशतवाद्यांना समोरासमोर गुंतवून जीवितहानी टाळण्यास सांगितले आहे. वेळेचा काही प्रश्न नाही. यामुळे आपण दहशतवाद्यांना दमवू आणि नंतर त्यांचा खात्मा करू, असे लष्कराने ठरविले आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन रणनिती आखली आहे. या अंतर्गत, थांबा, दहशतवाद्यांना गावापर्यंत येऊ द्या, मग त्यांचा खात्मा करण्याचे धोरण राबवले जात आहे. गेल्या काही महिन्यांत लष्करचे 9 ते 10 दहशतवादी पाकिस्तानातून राजौरी-पुंछ जिल्ह्याच्या जंगलात शिरले होते. याशिवाय, घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले, पण लष्कराने त्यांना उधळून लावले.
राजौरीच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 9 जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी 16 ऑक्टोबर रोजी या भागाला भेट दिली होती.दहशतवादविरोधी कारवाया हाताळणाऱ्या कमांडर्सशी त्यांनी चर्चा केली होती.त्यांनी सैनिकांना दहशतवाद्यांच्या हालचालींची वाट पाहण्यास सांगितले.
लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दहशतवादी प्रत्येकी दोन तुकड्यांमध्ये फिरले. यामुळे त्यांना त्यांचे स्थान सतत बदलण्यास मदत झाली आणि भारतीय लष्कराच्या अधिक सैनिकांना इजा झाली. भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांच्या शोधात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
The army’s new strategy to pick up terrorists in Kashmir will pick up when they come to the village to eat and drink
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा
ReplyReply allForward
|