• Download App
    तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले- सत्ता आली तर आम्हीही बुलडोझर चालवू, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना यूपीच्या धर्तीवर शिक्षा देऊ|Telangana BJP chief said - If we come to power, we will also run a bulldozer, punish those who commit crimes against women on the lines of UP

    तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले- सत्ता आली तर आम्हीही बुलडोझर चालवू, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना यूपीच्या धर्तीवर शिक्षा देऊ

    प्रतिनिधी

    हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे की, सत्तेत आल्यास त्यांचा पक्ष महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवेल. यासाठी ते यूपी मॉडेलचा अवलंब करतील, तिथे योगी सरकारही गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर चालवत आहे. हैदराबाद येथील पक्ष कार्यालयावर धरणे आंदोलनादरम्यान बंदी संजय यांनी ही माहिती दिली. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपने हे धरणे आंदोलन केले.Telangana BJP chief said – If we come to power, we will also run a bulldozer, punish those who commit crimes against women on the lines of UP

    यापूर्वी काकतिया मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी प्रीती हिने वरिष्ठ विद्यार्थ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. तेलंगणातील महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटनांनी आवाज उठवला आहे. तेलंगण सरकारने मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ठोस कारवाईची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.



    बंदी संजय म्हणाले- दंगलीच्या भीतीने राज्य सरकार सैफला पाठिंबा देतेय

    प्रीतीच्या मृत्यूची वर्तमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. रविवारी जानगाव जिल्ह्यात प्रीतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या संजय यांनी प्रीतीच्या हत्येला आत्महत्येचे स्वरूप दिले जात असल्याचा आरोप केला होता. आरोपी जातीय दंगली घडवू शकतात, अशी भीती असल्याने राज्य सरकार प्रीतीच्या कॉलेजमधील सीनियर सैफला पाठिंबा देत असल्याचेही ते म्हणाले.

    Telangana BJP chief said – If we come to power, we will also run a bulldozer, punish those who commit crimes against women on the lines of UP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!