• Download App
    तेजस फायटर विमाने सवोत्कृष्ठ, टीका चुकीची, माजी एअर चिफ मार्शल फिलीप राजकुमार यांचा निर्वाळा|Tejas fighter jets are the best, criticism is wrong, former Air Chief Marshal Philip Rajkumar is dead

    तेजस फायटर विमाने सवोत्कृष्ठ, टीका चुकीची, माजी एअर चिफ मार्शल फिलीप राजकुमार यांचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: संपूर्णपणे भारतीय बनावटीची असलेली तेजस फायटर विमाने हे सर्वोत्कृष्ठ आहे. त्याच्या दर्जाबाबत घेतली जात असलेली शंका दुर्दैवी असल्याचे मत माजी एअर मार्शल मार्शल फिलिप राजकुमार (निवृत्त) यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी ७८ व्या वर्षी तेजस विमानाचे सारथ्य केले होते. हा एक अत्यंत उत्कट अनुभव होता असेही त्यांनी सांगितले.Tejas fighter jets are the best, criticism is wrong, former Air Chief Marshal Philip Rajkumar is dead

    राजकुमार आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त बोलताना म्हणाले, अगदी निर्मितीच्या अवस्थेत असल्यापासून आपण तेजसशी जोडले गेलो होतो. त्याची कामगिरी उत्कृष्ठ होणार याचा विश्वास होता प्रकल्पाचे कार्यक्रम संचालक म्हणून पहिले विमानही चालविले होते. कोणत्याही अपघाताशिवाय तेजसने पाच हजार उड्डाणे केली आहेत.



    १९६२ साली हवाई दलात सामील झालेले राजुमार हे देशातील सर्वात अनुभवी वैमानिक मानले जातात.राजकुमार, जे 1962 मध्ये कमिशन झाले आणि 2001 मध्ये सेवानिवृत्त झाले, ते भारतीय वायुसेनेच्या सर्वात अनुभवी चाचणी वैमानिकांपैकी एक आहेत.

    १९९४ मध्ये हवाई दलात अतिरिक्त सहाय्यक प्रमुख असताना राजकुमार यांना एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए)यांच्याकडे तेजसच्या निर्मितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यावेळी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक होते. त्यांच्यानंतर राजकुमार महासंचालक बनले. त्यांनी तेजसचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे.

    Tejas fighter jets are the best, criticism is wrong, former Air Chief Marshal Philip Rajkumar is dead

    महत्तवाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही