• Download App
    टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट; टी 20 पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वाTeam India's Diwali gift to Indians; Pakistan lost in the first T20 match

    टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट; टी 20 पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा

    वृत्तसंस्था

    मेलबर्न : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरला. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला. Team India’s Diwali gift to Indians; Pakistan lost in the first T20 match

    टीम इंडियाला पाकिस्तानकडून 160 रन्सचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानचीही फलंदाजी करताना फारशी चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच चेंडूवर शून्यावर  पायचीत अर्शदीपने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर मोहम्मद रिझवानही जास्त वेळ टिकला नाही. 4 धावांवर असताना अर्शदीपने सेट अप लावत आपल्या जाळ्यात अडकवलं. 15 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले होते.

    शमीनंतर हार्दिकने शादाब 5, हैदर अली 2, मोहम्मद नवाझ 9 यांना माघारी पाठवले. दुसरीकडे शान मसूदने शेवटपर्यंत नाबाद राहत एक बाजू लावून धरली होती, त्याने 52 धावा केल्या. शेवटला शाहिन आफ्रिदीने एक चौकार आणि 1 षटकार मारत 16 धावा केल्या. भारताच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    टीम इंडियाची खराब सुरुवात

    टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल अवघ्या 4 रन्सवर करुन बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमारने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यालाही यामध्ये यश मिळाले नाही. तो 15 रन्स करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरत तडाखेबंद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.

    Team India’s Diwali gift to Indians; Pakistan lost in the first T20 match

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत