• Download App
    तस्लिमा नसरीन द्वेषााच्या प्रतिक, भारताच्या तुकड्यांवर पडून, अससुद्दीन ओवेसी यांचा आरोप|Taslima Nasreen symbolizes hatred, accuses Assuddin Owaisi

    तस्लिमा नसरीन द्वेषााच्या प्रतिक, भारताच्या तुकड्यांवर पडून, अससुद्दीन ओवेसी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन या द्वेषच्या प्रतिक आहेत. जी व्यक्ती भारताच्या तुकड्यांवर पडून आहे. जी व्यक्ती आपल्या देशात स्वत:ला वाचवू शकली नाही, तिच्याबद्दल मी येथे बसून बोलणार नाही, असे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.Taslima Nasreen symbolizes hatred, accuses Assuddin Owaisi

    तस्लिमा नसरीन यांनी हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत, असा दावा केला होता. तस्लिमा यांच्या या वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया देत त्या द्वेषाचे प्रतीक असल्याचं म्हटलंय.



     

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ह्लङ्घमी इथे बसून द्वेषाचे प्रतीक बनलेल्या व्यक्तीला उत्तर देणार नाही. मी इथे बसून अशा व्यक्तीला उत्तर देणार नाही, ज्याला मी उत्तर देणार नाही ज्याला आश्रय दिला गेलाय आणि जो भारताच्या तुकड्यांवर कोण पडून आहे. जी व्यक्ती आपल्या देशात स्वत:ला वाचवू शकली नाही, तिच्याबद्दल मी येथे बसून बोलणार नाही.

    असदुद्दीन ओवेसी म्हणाले, उदारमतवादी व्यक्ती केवळ त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्यात आनंदी आहेत. उदारमतवाद्यांना प्रत्येक मुस्लिमाने त्यांच्यासारखे वागावे असे वाटते. तर, उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्यांची अशी इच्छा आहे, की आम्हाला संविधानाने दिलेली आमची धार्मिक ओळख सोडावी.

    आज मी इथे बसून भारतीय संविधानाबद्दल बोलेन ज्याने मला निवडीचे स्वातंत्र्य, विवेकाचे स्वातंत्र्य दिले आहे आणि मला माझी धार्मिक ओळख पुढे नेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि कोणीही कोणत्याही व्यक्तीला धर्म सोडण्यास सांगू शकत नाही. भारत हा बहु-सांस्कृतिक, बहु-धार्मिक देश आहे.

    पण मला कोणीही कसे वागावे हे सांगू शकत नाही आणि कोणीही मला माझा धर्म सोडण्यास, माझी संस्कृती सोडण्यास सांगू शकत नाही असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले.एका मुलाखतीत तस्लिमा नसरीन यांनी दावा केला होता की हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत.

    काही मुस्लिमांना वाटते की हिजाब आवश्यक आहे आणि काहींना असे वाटते की हिजाब आवश्यक नाही. परंतु, हिजाबची सुरुवात ७ व्या शतकात काही दुष्कर्मवाद्यांनी केली. कारण त्या वेळी स्त्रियांना लैंगिक वस्तू म्हणून वागवले जात होते.

    त्यांचा असा विश्वास होता की पुरुषांनी स्त्रियांना पाहिले की त्यांच्या मनात लैंगिक इच्छा जागी होईल. त्यामुळे स्त्रियांनी स्वत:ला पुरुषांपासून लपवून ठेवण्यासाठी हिजाब किंवा बुरखा घालावा लागतो.

    Taslima Nasreen symbolizes hatred, accuses Assuddin Owaisi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक