वृत्तसंस्था
चेन्नई : CM Vijay तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे.CM Vijay
डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले पाहिजे होते, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे.CM Vijay
यावर विजय यांच्या पक्षाने (TVK) स्पष्टीकरण देताना सांगितले की, गाणी कधी वाजवायची हा निर्णय राज्यपालांचा होता. परंतु डीएमके नेते टी.के.एस. एलंगोवन यांनी म्हटले की, राज्याची परंपरा तामीळ राज्यगीत आधी आणि राष्ट्रगीत शेवटी वाजवण्याची आहे. विजय आता भाजपच्या विचारसरणीकडे झुकत आहेत.CM Vijay
विजय यांच्या शपथविधीमध्ये सर्वात आधी 2 मिनिटे 52 सेकंद ‘वंदे मातरम’ वाजवले गेले. त्यानंतर 52 सेकंदांसाठी ‘जन गण मन’ वाजवले गेले. यानंतर 65 सेकंद तामीळ राज्यगीत वाजवण्यात आले.
मित्रपक्षांनीही विरोध केला
शपथविधीत तमिळ राज्यगीत तिसऱ्या क्रमांकावर वाजल्याने CPI, CPIM आणि VKC ने देखील टीका केली आहे. CPI चे राज्य सचिव एम. वीरपांडियन म्हणाले की, सरकारी कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये तमिळ राज्यगीताला पहिले प्राधान्य मिळायला हवे.
तामिळनाडू निवडणुकांमध्ये विजयच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या होत्या. विजयच्या सरकारला काँग्रेस, CPI, CPIM, IUML आणि VKC चा पाठिंबा मिळाला आहे. तर, DMK च्या आयटी विंगने विजयला विचारले की, तमिळ राज्यगीताला बाजूला करणेच TVK च्या नवीन बदलाचा भाग आहे का?
1891 मध्ये लिहिलेले तामिळनाडूचे राज्यगीत
‘तमिळ थाई वाझथु’ हे तामिळनाडूचे राज्यगीत आहे. ते 1891 मध्ये मनोन्मनीयम सुंदरम पिल्लई यांनी त्यांच्या ‘मनोन्मनीयम’ या नाटकाच्या सुरुवातीच्या भागात तमिळ देवीच्या स्तुतीसाठी लिहिले होते.
नंतर एम.एस. विश्वनाथन यांनी या गीतासाठी संगीत तयार केले. हे गीत राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानले जाते. याच कारणामुळे कोणत्याही सरकारी कार्यक्रमात ते सर्वात आधी गाण्याची परंपरा आहे.
18 डिसेंबर 2021 रोजी DMK च्या तामिळनाडू सरकारने ‘तमिळ थाई वाझथु’ ला अधिकृतपणे राज्यगीत म्हणून घोषित केले आहे. सरकारने निर्देश दिले आहेत की, याच्या गायनादरम्यान उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी सन्मानार्थ उभे राहावे.
यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले होते की, ‘तमिळ थाई वाजथु’ हे केवळ एक प्रार्थना गीत आहे, राष्ट्रगीत किंवा राज्यगीत नाही.
National Anthem Controversy at CM Vijay’s Oath-Taking Ceremony
महत्वाच्या बातम्या
- केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!
- एल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जलसंधारणाच्या कामांना युद्धपातळीवर गती
- TVK : विजय पुढे खरे आव्हान निर्णयांमधला धडाका आणि बोलण्यातला तडाखा टिकवण्याचे!!
- आता PF काढणे होणार ATM आणि UPIइतके सोपे! EPFOच्या नव्या सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा