• Download App
    सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन|Take an oath for a strong, self-reliant India, appeals Union Home Minister Amit Shah

    सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वैयक्तिक पातळीवर पावले उचलून 100 व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत देशाला सशक्त करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकाने शपथ घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. नागरिकांमधील ही जागरुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि इतर योजनांच्या रचनात्मक कृतीकडे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.Take an oath for a strong, self-reliant India, appeals Union Home Minister Amit Shah

    नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोंनी हाती घेतलेल्या 7,500 किमीच्या कार रॅलीला लाल किल्ला येथे हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. शाह म्हणाले, देशाला पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करण्याची शपथ प्रत्येक नागरिकाने घेतल्यास,



    देशाला आपण आत्मनिर्भर करू शकतो आणि एक शक्तिशाली देश म्हणून गौरव मिळवून देऊ शकतो.नागरिकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात आवाहन केले होते. भारताचा विकास घडवण्याचा उद्देश त्या आवाहनामागे होता.

    देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर करून विकसित करण्यासाठी देशातील नागरिकांनी एकत्र यावे आणि समर्पित वृत्तीने काम करावे, असे आवाहन मी देशातील प्रत्येक नागरिकाला करीत असल्याचे शाह यांनी सांगितले.

    Take an oath for a strong, self-reliant India, appeals Union Home Minister Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे