वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांचे PA बिभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बिभव तुरुंगात होते. न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ते म्हणाले की, 51 साक्षीदार तपासायचे आहेत, त्यामुळे खटला पूर्ण होण्यास वेळ लागेल. न्यायाधीशांनी सांगितले की कुमार 100 दिवसांच्या कोठडीत आहे आणि या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात काही गैर नाही.
बिभव यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या पदावर पुन्हा रुजू केले जाणार नाही आणि त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोणतेही अधिकृत काम सोपवले जाणार नाही, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. बिभव कुमार यांच्यावर 13 मे रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांना 18 मे रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे.
बिभवविरुद्ध 50 साक्षीदारांसह आरोपपत्र दाखल
30 जुलै रोजी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात स्वाती मालीवाल खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 500 पानांच्या या आरोपपत्रात सुमारे 50 साक्षीदारांचे जबाब आहेत.
काय आहे स्वाती मालीवाल प्राणघातक हल्ला प्रकरण…
बिभववर 13 मे रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी 16 मे रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला होता.
स्वाती यांनी दावा केला होता की, त्या केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. तेथे बिभवने त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून रोखले आणि मारहाण केली. बिभवने त्यांना 7-8 चपराक दिल्या. पोटावर आणि प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली. यामुळे त्यांच्या शर्टाची बटणे तुटली. मालीवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कपडे उघडे पडले होते, पण बिभवने त्यांना मारणे थांबवले नाही. बिभवने टेबलावर डोके आपटले. केजरीवाल घरी होते, पण तरीही कोणी मदतीला आले नाही.
Supreme Court Bail to Kejriwal’s PA Bibhava
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले