• Download App
    देशभर विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू; अनेक मुख्यमंत्र्यांचा पुढाकार । Students vaccination begins in India

    देशभर विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू; अनेक मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज देशभरात विद्यार्थ्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा, बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, तामिळनाडू मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, महाराष्ट्रात आरोग्य मंत्री राजेश टोपे, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कर्नाटकात बसवराज बोम्मई, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, राजस्थान मध्ये अशोक गहलोत तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल मनोज सिन्हा, गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदींनी स्वतः उपस्थित राहून आपापल्या राज्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. Students vaccination begins in India

    देशभरात ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना विद्यार्थ्यांचे लसीकरण महत्त्वाचे आहे. ओमायक्रोनचा फैलाव जरी वेगाने होत असला तरी त्याची लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वेगात आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

    शाळा आणि महाविद्यालयाचा सुरू झाली आहेत. त्यामुळे तातडीने लॉकडाऊन लावून शाळा महाविद्यालये बंद करण्याची परिस्थिती येऊ नये, असे आमचे प्रयत्न आहेत असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी सांगितले. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लोग डाऊन विषयी प्रतिकूल मत व्यक्त केले असून लॉकडाऊनपेक्षा लसीकरण कार्यक्रमावर भर देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Students vaccination begins in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच