दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्य चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेते विसरून गेले आहेत, असा आरोप राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांनी केला आहे.struggle to become a leader, the issues of the farmers were forgotten. V.M. Singh’s criticism of the farmers’ movement
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्य चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेते विसरून गेले आहेत, असा आरोप राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंग यांनी केला आहे.
सिंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी काही चांगली कामे करण्यासाठी त्यांना थोडी सद्बुद्धी मिळो. किमान आपलेही आणि शेतकऱ्यांचे तरी भलं करतील. नेत्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. आंदोलन योग्य दिशेने नेले पाहिजे.
पण नेता बनण्याच्या चढाओढीत राहण्यापेक्षा शेतकऱ्यांचे मुद्दे पुढे नेले पाहिजेत.ऑगस्ट क्रांतीच्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला शेतकरी आंदोलनाचा आवाज आपण उठवला होता असे सांगून व्ही. एम. सिंग म्हणाले,
शेतकऱ्याचे रक्षण व्हावे आणि त्यांच्या कुटुंबा फायदा व्हाव, हे आपलं ध्येय असते. शेतकऱ्यांना मार खाऊ घालणं किंवा त्यांना मरणासाठीचा आपला प्रयत्न कधीच राहिलेला नाही. २६ जानेवारीला दिल्लीत जे काही झालं त्यानंतर आपण आंदोलनातून बाहेर पडलो.
कारण आंदोलनला जे स्वरुप दिले गेले ते योग्य नव्हते. आम्ही शेतकऱ्यांच्या उज्जल भवितव्यासाठी काम करत आलोय, करणार आणि करत राहणार. शेतकऱ्यांचा गहू एमएसपीवर विकण्याचे काम करत आहोत. आमच्या लोकांवर गुन्हेही दाखल केले गेलेत.
struggle to become a leader, the issues of the farmers were forgotten. V.M. Singh’s criticism of the farmers’ movement
महत्त्वाच्या बातम्या
- अशोक चव्हाण म्हणाले , नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जात आहेत
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार