• Download App
    Congress आणीबाणी विरोधी आंदोलनाने दिली होती काँग्रेस मुक्त शासनाची संधी; पण संघाचा द्वेष करून समाजवाद्यांनी ती गमावली!!

    आणीबाणी विरोधी आंदोलनाने दिली होती काँग्रेस मुक्त शासनाची संधी; पण संघाचा द्वेष करून समाजवाद्यांनी ती गमावली!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 नंतर काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. त्यावरून राजकीय वातावरण खूप तापले. मोदींना लोकशाही विरोधी ठरविण्यापर्यंत सगळ्यांची मजल गेली. पण प्रत्यक्षात आणीबाणी विरोधातल्या आंदोलनाने देशात काँग्रेस मुक्त शासनाची संधी पहिल्यांदा उपलब्ध करून दिली होती, ती घेताना काँग्रेस वगळून सगळे राजकीय पक्ष एकवटले होते. त्यामध्ये जनसंघ, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आणि त्या वेळचे अन्य प्रादेशिक पक्ष सामील होते. Congress

    या सगळ्या पक्षांनी एकवटून इंदिरा गांधींची जुलमी आणि हुकूमशाही राजवट उलथवून लावली. त्यांनी एकजुटीने 28 महिने राज्य केले, पण समाजवाद्यांनी मात्र त्यांच्या नेहमीच्या राजकीय सवयीने एक खुळचट संकल्पनेतून काँग्रेस मुक्त चांगल्या शासनाची संधी गमावली.

    जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनानुसार समाजवादी पक्ष भारतीय लोक दल जनसंघ या पक्षांनी आपले अस्तित्व मिटवून एक जनता पक्ष तयार केला होता. 1977 च्या निवडणुकीत संपूर्ण देशातल्या जनतेने या जनता पक्षाचा झेंडा उचलून धरला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगला कौल देखील दिला होता. त्यावेळी नेत्यांपेक्षा देशातल्या जनतेनेच काँग्रेसमुक्त शासनाकडे वेगाने वाटचाल केली होती. जनता पक्ष सुरुवातीला जनतेच्या या अपेक्षेवर खरा देखील उतरला होता.



    आंदोलनाला संघ हवा, सत्तेमध्ये नको

    पण लवकरच जनता पक्षातल्या मूळच्या काँग्रेसी प्रवृत्तीच्या नेत्यांनी सत्तेसाठी भांडणे सुरू केली. मोरारजी विरुद्ध चरण सिंग चरण सिंग, विरुद्ध बाबू जगजीवन राम अशी भांडणे वाढत गेली. पण त्यामध्ये सगळ्यात जास्त वैचारिक भेद जुन्या समाजवाद्यांनी पसरवून दिला. सामाजिक क्रांतीच्या नावाखाली त्यांनी जनसंघाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दडपायला सुरुवात केली. वास्तविक आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा दिली होती त्यावेळी आंदोलन करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते हिरीरीने मैदानात उतरले होते. समाजवादी पक्षाचे नेते बोलण्यात आघाडीवर आणि संघाचे कार्यकर्ते मैदानात लढण्यात आघाडीवर असे त्यावेळचे हे चित्र होते. समाजवादी नेत्यांना संघाचे कार्यकर्ते लढाईच्या मैदानात हवे होते. कारण त्यांचे संख्याबळ जास्त होते. त्यानंतर मिळालेल्या सत्तेच्या वाट्यात वाटा द्यायला मात्र त्यांचा विरोध होता. इतकेच काय पण नंतर तर समाजवादी नेत्यांना संघाच्या स्वयंसेवकांची सावली देखील नकोशी झाली होती. त्यामुळे मधु लिमये यांच्यासारख्या विचारवंत नेत्याने दुहेरी सदस्यत्वाचे पिल्लू सोडून दिले.

    समाजवाद्यांची दुटप्पी भूमिका

    जनता पक्षाने संसदीय बोर्डात ठराव मंजूर करून जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला संघाच्या दैनंदिन कामकाजात भाग घ्यायला प्रतिबंध केला. याचा अर्थ एकतर संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करता येईल तेव्हा जनता पक्षाचा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करता येईल, अशी लोकशाही विरोधातली भूमिका जनता पक्षाने घेतली. त्याला समाजवादी प्रवृत्तीचे नेते कारणीभूत ठरले. त्यामुळे जनता पक्षात उभी फूट पडली जनसंघ बाहेर पडून त्याने भारतीय जनता पक्ष या नावाने काम सुरू केले. परिणामी जनता पक्षाची सत्ता अवघ्या 28 महिन्यांमध्ये संपली. काँग्रेस मुक्त शासनाचे स्वप्न भंगले. 1980 इंदिरा गांधींना सत्ता वापसीची संधी मिळाली.

    नावाला समाजवादी, प्रत्यक्षात जातीवादी

    पण त्या पलीकडे जाऊन समाजवादी तत्त्वाच्या चळवळीची पुरती वाताहत झाली. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले मुलायम सिंग यादव, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांनी तद्दन जातीवादी भूमिका घेतली. यादव + मुस्लिम, जाटव सारखी जातीवादी समीकरणे अस्तित्वात आणून त्या जातीवादी भूमिकेतूनच ते उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सारख्या राज्यांमध्ये सत्तेवर आले. समाजवादाचे मूळचे समाज सत्तावादाचे म्हणजेच गरिबांच्या सत्तेचे स्वप्न पूर्ण भंगले. त्याऐवजी या नेत्यांनी जातीवादाचे समाजात फूट पाडणारे तत्वज्ञान “समाजवादी तत्त्वज्ञान” म्हणून पुढे आणले. लोहिया, जयप्रकाश यांचा समाजवादी वारसा यादव नितीश कुमार वगैरे नेत्यांनी संपुष्टात आणला. जातीवादी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी काँग्रेसची देखील मदत घेतली आणि काँग्रेसला मदत केली. मधु लिमये यांच्यासारख्या नेत्यांनी जनसंघाला जातीवादी म्हणून दूर ठेवले पण त्यांचे समाजवादी अनुयायी वारस मात्र जातीवादात आकंठ बुडाले.

    Socialist leaders lost the opportunity to rule the country Congress free

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bikram Majithia : पंजाबचे माजी मंत्री बिक्रम मजिठिया यांना अटक!

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!