• Download App
    बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचारावर स्मृती इराणींचा सवाल; ‘’राहुल गांधींना मृत्यूचा ‘खेला’ मान्य का?’’Smriti Iranis Question on Election Violence in Bengal Does Rahul Gandhi accept the game of death

    बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचारावर स्मृती इराणींचा सवाल; ‘’राहुल गांधींना मृत्यूचा ‘खेला’ मान्य का?’’

    बंगालमधील हिंसाचारावर राहुल गांधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आणि त्यांना विचारले की अशा घटना त्यांना मान्य आहेत का? Smriti Iranis Question on Election Violence in Bengal Does Rahul Gandhi accept the game of death

    पश्चिम बंगालमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान राज्याच्या ग्रामीण भागात हिंसाचार आणि जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या. यामध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाला. या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात चुरशीची लढत झाल्याचे बोलले जात आहे.  तर, बंगालमधील हिंसाचारावर राहुल गांधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

    भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, पश्‍चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमध्ये लोकशाहीचा घातपात होताना लोक पाहत आहेत, जिथे लोकशाही हक्क बजावण्यासाठी लोकांची हत्या केली जात आहे. काँग्रेस त्याच तृणमूलशी हातमिळवणी करत आहे, जे पश्चिम बंगालमध्ये कहर करत आहेत त्यांच्याशी हातमिळवणी करणे मान्य आहे का? मृत्यूचा हा खेला राहुल गांधी मान्य आहे का?

    Smriti Iranis Question on Election Violence in Bengal Does Rahul Gandhi accept the game of death

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले