• Download App
    S Jaishankar एस. जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला

    S Jaishankar : एस. जयशंकर यांनी नाव न घेता राहुल गांधींना टोला लगावला, म्हणाले…

    S Jaishankar

    जाणून घ्या, जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना एस जयशंकर नेमकं काय म्हणाले


    विशेष प्रतिनिधी

    जिनिव्हा : स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘खटाखट’ वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. जयशंकर  ( S Jaishankar ) म्हणाले की जीवनात कोणतीही गोष्ट “खटाखट” होत नाही, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात. जिनिव्हा येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना जयशंकर यांची ही प्रतिक्रिया आली. त्यांनी लोकांना सांगितले की जीवन “खटाखट” नाही. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत



    जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षात भारतात झालेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची माहिती दिली. ते म्हणाले, जोपर्यंत तुम्ही मनुष्यबळ विकसित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कठोर परिश्रम करत राहावे लागेल आणि तोपर्यंत पायाभूत सुविधांचा विकास होत नाही, जोपर्यंत तुमच्याकडे धोरणे नाहीत, असेही ते म्हणाले. म्हणूनच आयुष्यात काहीही “खटाखट” होत नाही. त्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. काहीही वेगळं करायचं असेल तर जीवनात मेहनती असणं आवश्यक आहे.

    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धक्कादायक विधान केले होते. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास प्रत्येक महिलेच्या खात्यात एक लाख रुपये तत्काळ हस्तांतरित केले जातील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची बरीच चर्चा झाली. निवडणुका संपल्यानंतर महिलांनी अनेक राज्यांतील काँग्रेस कार्यालयात निदर्शने करून १ लाख रुपयांची मागणी केली. राहुल गांधींनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे ते म्हणाले.

    S Jaishankar taunted Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!