• Download App
    चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले ‘’दोन देशांमधील संबंधांचा विकास फक्त...’’ Rajnath Singh met Chinas Defense Minister in the SCO meeting

    चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजनाथ सिंह म्हणाले ‘’दोन देशांमधील संबंधांचा विकास फक्त…’’

    पूर्व लडाखमधील सीमावादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू यांची भेट घेतली. राजनाथ सिंह म्हणाले की, ‘’भारत-चीन संबंधांचा विकास हा सीमेवर शांतता पसरवण्यावरच आधारित आहे. LAC वरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक आहे.’’ Rajnath Singh met Chinas Defense Minister in the SCO meeting

    या बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दोन्ही मंत्र्यांनी भारत-चीन सीमावर्ती भाग तसेच द्विपक्षीय संबंधांच्या विकासाबाबत स्पष्ट चर्चा केली. ते म्हणाले की LAC वरील सर्व समस्या विद्यमान द्विपक्षीय करार आणि वचनबद्धतेनुसार सोडवणे आवश्यक आहे. विद्यमान करारांच्या उल्लंघनामुळे द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण पायाच नष्ट झाला आहे. असा पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी केला.

    गलवान संघर्षानंतरचा पहिला भारत दौरा –

    शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी शांगफू दिल्लीला पोहोचल्यानंतर ही चर्चा झाली. SCO च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन भारत करत आहे. तीन वर्षांपूर्वी पूर्व लडाखमधील सीमावादानंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. गोव्यात होणाऱ्या SCO सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे परराष्ट्र मंत्री चिन कांग हेही पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. 4 आणि 5 मे रोजी ही बैठक होणार आहे.

    Rajnath Singh met Chinas Defense Minister in the SCO meeting

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!