Thursday, 8 May 2025
  • Download App
    राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग rahul Gandhi will once again take out Bharat Jodo Yatra

    राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर निघणार आहेत. त्यांचीही भारत जोडो-भाग 2 ही गुजरात ते मेघालय अशी असणार आहे. ahul Gandhi will once again take out Bharat Jodo Yatra

    पूर्व-पश्चिम असेल यात्रा

    राहुल यांची पहिली भारत जोडो यात्रा दक्षिण ते उत्तर अशी होती. आता दुसरी भारत जोडो यात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे असेल. हा प्रवास कधी सुरू होणार हे सध्या तरी जाहीर करण्यात आलेले नाही.

    पटोलेंनी दिली माहिती

    महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या पहिल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे आता दुसरी भारत जोडो यात्रा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ते ज्या वेळी भारत जोडो यात्रा काढतील त्याच वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते त्यांच्या राज्यातही अशीच यात्रा काढतील, असे नाना पटोले म्हणाले.

    नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजपचीही प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणाले की, राहुल यांचा भारत जोडो दौरा अयशस्वी ठरला कारण त्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला.


    भारत जोडो यात्रेच्या समारोपात काँग्रेस नेते बर्फ वृष्टीत छत्री खाली भिजले!!; 2024 मध्ये परिणाम काय दिसणार??


    राहुल गांधी 136 दिवस चालले

    राहुल गांधींनी पहिली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरू केली. तेव्हा 12 राज्यांमधून ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली. यादरम्यान राहुल गांधींनी 4 हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला होता. राहुल गांधींना 136 दिवस लागले. यादरम्यान राहुल गांधी तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, यूपी, पंजाबमधून गेले.

    पुन्हा खासदारकी बहाल

    राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व या आठवड्यात बहाल करण्यात आले आहे. सुरत कोर्टाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले.

    राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत म्हणाले होते, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव सामान्य का आहे? सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का? राहुल यांच्या या विधानाबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर कलम 499, 500 अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. यानंतर राहुल यांचे सदस्यत्व गेले.

    सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली

    खासदार झाल्यानंतर राहुल गांधी यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, जिथे शिक्षेला स्थगिती देण्यात आली. यानंतर राहुल गांधी यांचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आणि ते पुन्हा वायनाडचे खासदार झाले.

    ahul Gandhi will once again take out Bharat Jodo Yatra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lahore Pakistan : पाकिस्तानातील लाहोरमध्ये एकामागून एक तीन स्फोट, आपत्कालीन सायरन वाजला

    अमृतसर एअर बेसवर हल्ला केल्याचा पाकिस्तानी हॅन्डलर्स कडून फेक व्हिडिओ व्हायरल; भारतीय संरक्षण मंत्रालयाचा स्पष्ट खुलासा!!

    Operation Sindoor मध्ये 100 + दहशतवाद्यांचा खात्मा; फेक न्यूजच्या गदारोळात भारत सरकारकडून अधिकृत आकडा जाहीर!!