• Download App
    खेळाडूंचे अभिनंदन खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, राहुल यांचा सरकारला चिमटा। Rahul Gandhi Targets Modi Govt.

    खेळाडूंचे अभिनंदन खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, राहुल यांचा सरकारला चिमटा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : खेळाडूंचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांना हक्कही मिळवून द्यायला हवा. फोन कॉल खूप झाले, आता बक्षीसाची रक्कम द्या, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. Rahul Gandhi Targets Modi Govt.

    राहुल गांधी यांनी नीरज चोप्राचे जुने ट्विटसचे फोटो आपल्या पोस्टबरोबर शेअर केले. त्यात म्हटले की, आपण खेळाडूंना जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम तात्काळ द्या. आपण या गोष्टीत फार काळ न अडकता संपूर्ण लक्ष आगामी ऑलिंपिक खेळाकडे केंद्रीत करू. जेणेकरून आपले खेळाडू देशाचे, राज्याचे नाव उंचावू शकतील.


    राहुल गांधींनंतर ट्विटरने आता काँग्रेसचे ‘INC TV’चे अकाउंट केले ब्लॉक, नियमांच्या उल्लंघनाचा दिला हवाला


     

    चोप्राचे एक जुने ट्विट आहे. त्यात म्हटले की, आम्ही जेव्हा पदक जिंकून येतो, तेव्हा संपूर्ण देश आनंदी होतो. आपणही अभिमानाने हा हरियानाचा खेळाडू आहे, असे म्हणतो. हरियानाच्या खेळाडूंनी क्रीडा जगात वेगळी छाप निर्माण केली आहे. दुसरे राज्य देखील हरियानचे दाखले देतात. कृपया हे दाखले कायम राहू द्या. हे दोन्ही ट्विटस वाचल्यानंतर असे लक्षात येते की, भारताला सुवर्णपदक जिंकून देणारे नीरज चोप्रा हे स्वत:च अडचणीचा सामना करत आहेत. राहुल गांधी यांनी यासंदर्भात सरकारवर टीका केली आहे.

    Rahul Gandhi Targets Modi Govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही, ते मोदी सरकारला विचारताहेत तुम्ही आणखी पुढे का गेला नाहीत??; परराष्ट्र मंत्र्यांचा लोकसभेत हल्लाबोल

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भारताला सोन्याची चिडिया नव्हे, सिंह बनायचे आहे; जगाला सत्तेची भाषा समजते; विश्वगुरू भारत युद्धाचे कारण बनणार नाही

    ममता बॅनर्जींनी उचलले भाषा आंदोलनाचे शस्त्र; पण त्यातून रोहिंग्या आणि बांगलादेशींना चिकटवले भारताचे नागरिकत्व!!