कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्रकारांनी आंब्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपल्याला उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही. आंध्र प्रदेशचा आवडतो. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. Rahul Gandhi said, “I don’t like mangoes from Uttar Pradesh, but the response of Chief Minister Yogi is that your taste is divisive; Read detailed
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पेगासस विषयावर पत्रकार परिषदेत खासदार राहुल गांधींनी आंबा विषयी केलेल्या वक्तव्याचा पलटवार केला आहे. यूपीचे सीएम योगी यांनी राहुल गांधींचा आंबा विषयाच्या संबंधित व्हिडिओ ट्विट करुन लिहिले आहे की तुमची वृत्ती विभाजक आहे. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्रकारांनी आंब्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपल्याला उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही. आंध्र प्रदेशचा आवडतो. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ट्विट केले की, “श्री राहुल गांधी जी, तुमची ‘टेस्ट’ फूट पाडणारी आहे. आपल्या विभाजन संस्कारांबद्दल संपूर्ण देश जागरूक आहे.आपल्यावर विघटनकारी गैरप्रकारांचा प्रभाव इतका प्रभावशाली आहे की आपण फळांची चव प्रादेशिकतेच्या अग्नीत फेकली आहे. पण हे लक्षात ठेवा की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा भारताचा ‘स्वाद’ एक आहे.
सीएम योगी यांच्या आधी गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनीही राहुल गांधींच्या आंबा वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. रवी किशन यांनी लिहिले होते, “राहुलजींना उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला देखील काँग्रेस आवडत नाही. त्यामुळं हिसाब बरोबर आहे.
“पुढच्या वर्षी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी स्वत: प्रियंका गांधी यांनी कॉंग्रेसच्या वतीने ही कमांड घेतली आहे. नुकतीच त्यांनी लखनऊलाही भेट दिली होती, ज्यात त्यांनी योगी सरकारवर शाब्दिक आक्रमण केले होते.
Rahul Gandhi said, “I don’t like mangoes from Uttar Pradesh, but the response of Chief Minister Yogi is that your taste is divisive; Read detailed
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय कृषी क्षेत्राची निर्यातीतही घौडदौड, जगातील पहिल्या दहा कृषी उत्पन्न निर्यातदार देशांच्या यादीत स्थान
- दोन अपत्यांचेच धोरण आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची संसदेत माहिती
- ममता सरकारने पश्चिम बंगाल बोर्डाचा टॉपर विद्यार्थी मुस्लिम असल्याचा मुद्दाम केला उल्लेख, भाजपने केला तुष्टीकरणाचा आरोप
- भारतातील कर्मचाऱ्यांचा पगार पुढील वर्षी चांगला वाढणार, पाहा कोणत्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वाढणार मागणी