• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा तोंडावर पडले, बिहारमधील गावकऱ्यांनी उघड केला खोटा दावा

    Rahul Gandhi'

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : Rahul Gandhi  बिहार विधानसभा निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आणखी एक आरोप फोल ठरला आहे. त्यांनी असा दावा केला होता की गया जिल्ह्यातील निडाणी गावात एका घराच्या पत्त्यावर तब्बल ९४७ मतदार नोंदवलेले आहेत. हा आरोप सोशल मीडियावर जोरदार पसरला. मात्र, प्रत्यक्ष गावकऱ्यांनी आणि निवडणूक आयोगानेच त्यांचा दावा खोडून काढत सांगितले की हा आरोप दिशाभूल करणारा आहे.Rahul Gandhi

    गया जिल्हाधिकारी व बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले की अनेक ग्रामीण भागांत घर क्रमांकच नसतात. अशा ठिकाणी मतदार यादीत प्रतीकात्मक किंवा नाममात्र घर क्रमांक वापरला जातो. त्यामुळे “९४७ मतदार एकाच घरात राहतात” हा आरोप चुकीचा ठरतो.Rahul Gandhi



    जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओत गावकऱ्यांनीही सांगितले की ते १९८७ पासून मतदान करत आहेत आणि मतदार यादीत कोणत्याही प्रकारचा फेरफार नाही. निवडणूक आयोगाची विशेष गहन पुनरिक्षण (SIR) मोहीम समाधानकारकपणे पार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

    याआधीही राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे आरोप केले होते. त्यावेळीही आयोगाने हे आरोप फोल ठरवत स्पष्ट केले होते की “घर क्रमांक 0” ही पद्धत बेघर किंवा घर क्रमांक नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आहे.

    बिहारमध्ये मात्र गावकऱ्यांनीच राहुल गांधींचा दावा फेटाळून लावल्याने ते पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत.

    Rahul Gandhi Falls Flat Again, Villagers in Bihar Expose His False Claim

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Russian Crude Oil : भारत पुन्हा रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवणार; 95 लाख बॅरल तेल टँकरवर नजर

    भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख सहभाग

    Abu Dhabi : इस्रायल-इराण युद्ध, अबू धाबीमध्ये इराणी हल्ल्यात भारतीय जखमी; दूतावासाने म्हटले- ते आता धोक्याबाहेर आहेत, भारतात 15 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने