• Download App
    राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!! Rahul Gandhi asks about OBC secretary

    राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने नव्या संसदेत 33% महिला आरक्षण विधेयक संमत करून घेतल्यानंतर नवीन मुद्दा हाताशी असावा म्हणून राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा उचलून धरला आहे. केंद्र सरकारमध्ये 90 पैकी फक्त 3 सचिव ओबीसी आहेत आणि त्यांच्या खात्याला फक्त 5 % बजेट आहे, असा आरोप त्यांनी सुरुवातीला राजधानी नवी दिल्लीत केला आणि आज तो मध्य प्रदेश मध्ये रिपीट केला. Rahul Gandhi asks about OBC secretary

    पण केंद्र सरकार मधल्या ज्या ओबीसी सचिवांविषयी राहुल गांधी भाषणात बोलले, ते ओबीसी सचिव काँग्रेसच्या राजवटीत नेमके किती होते??, याची आकडेवारी टाइम्स ऑफ इंडियाने एका बातमीत प्रसिद्ध केली आहे.

    2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसची राजवट होती. त्यावेळी ओबीसी सचिव 0, तर ओबीसी सहसचिव 2 होते, पण 2023 मध्ये ओबीसी सचिव 8 असून ओबीसी सहसचिवांची संख्या तर 55 एवढी आहे.

    भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे सचिव कधीच ओबीसी नव्हते, तर ते नेहमीच उच्चवर्णीय होते, असेही या बातमीत नमूद केले आहे.

    हिरूभाई मुळशीभाई पटेल हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वीय सचिव होते. एल. के. झा, पी. एन. हक्सर पी. एन. धर आणि पी. सी. अलेक्झांडर हे इंदिरा गांधींचे मुख्य स्वीय सचिव होते, पी. सी. अलेक्झांडर, सरला ग्रेवाल आणि बी. जी. गणेश हे राजीव गांधींचे सचिव होते, टी. ए. के. नायर, पुलक चटर्जी हे डॉ. मनमोहन सिंग यांचे सचिव होते. यापैकी कोणीही ओबीसी नव्हते, तर ते सर्व उच्चवर्णीय होते, असे बातमी स्पष्ट करण्यात आले आहे.

    Rahul Gandhi asks about OBC secretary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे