• Download App
    Punjab Aam Aadmi Party पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारची तीन

    पंजाबच्या आम आदमी पार्टी सरकारची तीन वर्षांची पूर्ती; आता केजरीवाल + मान लढणार ड्रग्स आणि भ्रष्टाचाराशी!!

    Kejriwal + Mann

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंजाब मधल्या आम आदमी पार्टी सरकारला आज 16 मार्च 25 रोजी तीन वर्षे पूर्ण झाली आणि आता अरविंद केजरीवाल तसेच मुख्यमंत्री भगवंत माने यांनी ड्रग्स आणि भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढण्याची घोषणा केली. पण त्यामुळे गेल्या तीन वर्षात भगवंत मान यांच्या सरकारने नेमके केले काय??, असा सवाल तयार झाला.Punjab Aam Aadmi Party government completes three years Now Kejriwal  Mann will fight drugs and corruption

    फेब्रुवारी 2022 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी आम आदमी पार्टीने तिथल्या काँग्रेस सरकारचा पराभव केला. प्रचंड बहुमताने पंजाब मध्ये सरकार स्थापन केले. कुठल्याही प्रादेशिक पक्षाचे आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन करण्याचे हे पहिले उदाहरण ठरले. कारण त्यावेळी आम आदमी पार्टी दिल्लीतही सत्तेवर होती.



     

    पण पंजाब मधले आम आदमी पार्टीचे सरकार तीन वर्षे पूर्ण करत असताना त्या पक्षाची दिल्लीतली सत्ता मात्र हातातून निसटली. केजरीवाल राजकीय दृष्ट्या बेरोजगार झाले. पण पंजाब सरकारच्या तीन वर्षांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे करण्यासाठी ते चंडीगडला पोहोचले. तिथेच त्यांनी मुख्यमंत्री भगवंत माने यांच्याबरोबरीने उभे राहून पंजाब मधल्या ड्रग्स आणि भ्रष्टाचाराशी लढण्याची घोषणा केली. पण त्यामुळेच गेल्या तीन वर्षात हा मागणी पार्टीच्या सरकारने पंजाब मध्ये काय केले??, असा सवाल तयार झाला. या तीन वर्षात मुख्यमंत्री भगवंत मान कुठल्या ना कुठल्या वादात अडकत गेले. त्यांनी केलेल्या परदेश दौऱ्यांमध्ये ते विमानात दारू प्यायल्याचे प्रकरण गाजले. पंजाबची आर्थिक हालत खस्ता झाली. त्यामुळे अनेक सरकारी योजना बंद कराव्या लागल्या. पण तरीही केजरीवाल आणि मान यांनी ड्रग्स आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जोमात करायची घोषणा केली.

    Punjab Aam Aadmi Party government completes three years Now Kejriwal  Mann will fight drugs and corruption

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Income Tax : 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सचा जुना कायदा बदलणार; 2026 मध्ये असेसमेंट वर्ष संपेल, आता फक्त टॅक्स वर्ष चालेल

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- बेकायदेशीर स्थलांतरितांवर सरकारची कारवाई योग्य; जर कोणी बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्यालाही बाहेर काढण्याचा हक्क

    Indian Blogger : चीनमध्ये भारतीय ब्लॉगर 15 तास ओलीस राहिला; ग्वांगझू विमानतळावर उपाशी ठेवले; दावा- अरुणाचलला भारताचा भाग दाखवणाऱ्या व्हिडिओवर कारवाई