• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिशन कर्मयोगी योजना, आयएएस नसलेले अधिकारीही आता घेऊ शकणार मसुरीत प्रशिक्षण|Prime Minister Narendra Modi's Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिशन कर्मयोगी योजना, आयएएस नसलेले अधिकारीही आता घेऊ शकणार मसुरीत प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मसुरी येथील प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये आता आयएस नसलेले वरिष्ठ अधिकारीही प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांच्या प्रक्षिणसाठी मिशन कर्मयोगी योजेनची घोषणा केली आहे.Prime Minister Narendra Modi’s Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    आतापर्यंत केवळ आयएएस अधिकारी सेवेतील वेगवेगळ्या तीन टप्यांत मसुरी येथे प्रशिक्षण मिळते. आयपीएस अधिकाऱ्यांना हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल येथे प्रशिक्षण दिले जाते. आता, ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत देशातील सर्व केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे. पहिला कार्यक्रम २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणा असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.



    अखिल भारतीय सेवा आणि इतर केंद्रीय गट ‘अ’ सेवा अधिका-यांना नागरी सेवांच्या 2000 आणि 2001 च्या बॅचमधील अधिकाºयांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध होणा आहेत. यामध्ये ४५ केंद्रीय गट सेवांमधील अधिकारी असतील.

    यामध्ये भारतीय महसूल सेवा, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा आणि केंद्रीय सचिवालय सेवा यांचा समावेश असेल. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढणार आहे. यामुळे नागरी सेवांमध्ये सुधशरणा होणार आहे.अधिकाऱ्यांना अर्जामध्ये त्यांनी आत्तापर्यंत काम केलेल्या क्षेत्रातील अनुभव, भविष्यात त्यांना कोणत्या क्षेत्रात काम करायचे याबाबतची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

    Prime Minister Narendra Modi’s Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज