• Download App
    भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशात चेंगराचेंगरी; तर राजस्थानात राजकीय रेटारेटी; काँग्रेसचा वाढता टीआरपी Political controversies gives more TRP to Congress bharat Jodo yatra than rahul Gandhi speeches

    भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशात चेंगराचेंगरी; तर राजस्थानात राजकीय रेटारेटी; काँग्रेसचा वाढता टीआरपी

    प्रतिनिधी

    इंदूर : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला टीआरपी मिळतो आहे, तो कुठल्यातरी वादामुळेच. राहुल गांधींनी निर्माण केलेला सावरकरांचा तथाकथित माफीनामा असो की मध्य प्रदेशात झालेली चेंगराचेंगरी असो, त्याच्याच बातम्या सगळीकडे झळकत आहेत. त्यापलिकडे देखील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजस्थानला अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट ही राजकीय रेटारेटी पुन्हा उफाळून आली आहे. Political controversies gives more TRP to Congress bharat Jodo yatra than rahul Gandhi speeches

    मध्य प्रदेशात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज मध्य प्रदेशातील पदयात्रेचा चौथा दिवस आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आज, शनिवारी ओंकारेश्वर ते इंदूरकडे निघाली आहे. यानंतर राहुल गांधी आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार असून, त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेणार आहेत. पण इंदूर मार्गावरून
    या यात्रेदरम्यान चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह खाली जमिनीवर कोसळले. तेथे उपस्थित असलेल्या समर्थकांनी त्यांना आधार देत सावरले.



    राहुल गांधी राजस्थान अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना बरोबर घेऊन भारत जोडो यात्रा करणार असले तरी त्याच्या आधीच या दोन्ही नेत्यांमधला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतल्या प्रत्येक भाषणात केंद्र सरकारवर वेगवेगळे मुद्द्यांवर टीका करतात. त्याच्याही थोड्या बातम्या माध्यमांमध्ये झळकतात. पण काँग्रेस मधल्या वादाच्या बातम्या मात्र भारत जोडो यात्रेला जास्त टीआरपी मिळवून देत असल्याचे दिसत आहे.

    Political controversies gives more TRP to Congress bharat Jodo yatra than rahul Gandhi speeches

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांबरोबरच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत देवेंद्र फडणवीस यांचा प्रमुख सहभाग

    Abu Dhabi : इस्रायल-इराण युद्ध, अबू धाबीमध्ये इराणी हल्ल्यात भारतीय जखमी; दूतावासाने म्हटले- ते आता धोक्याबाहेर आहेत, भारतात 15 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने

    T20 World Cup 2026 : भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये; 5 मार्चला इंग्लंडशी भिडणार, वेस्ट इंडीजचा 5 विकेट्सनी पराभव; सॅमसनच्या नाबाद 97 धावा