वृत्तसंस्था
कुर्नूल :PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करेल, तेव्हा तो “विकसित भारत” असेल. “मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की २१ वे शतक हे भारताचे १४० कोटी भारतीयांचे शतक असेल,” असे ते म्हणाले.PM Modi
आज जग २१ व्या शतकातील नवीन उत्पादन केंद्र म्हणून भारताकडे पाहत आहे. या यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे स्वावलंबी भारताचे स्वप्न. आपला आंध्र प्रदेश स्वावलंबी भारताचे एक प्रमुख केंद्र बनत आहे.PM Modi
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
तत्पूर्वी मोदींचे नंदयाल येथे आगमन झाले. त्यांनी श्रीशैलम येथील भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानला भेट दिली, पूजा केली आणि ध्यान केले. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंग आणि ५२ शक्तीपीठांपैकी एक आहे. हे एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दोन्ही आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फुर्ती केंद्राला भेट दिली आणि तेथे पूजा-अर्चना केली.
मोदींनी शिवाजी स्फुर्ती केंद्रात पूजा-अर्चना केली.
पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम येथील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट दिली आणि तेथे पूजा-अर्चना केली. हे एक स्मारक संकुल आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू देखील उपस्थित होते. येथे एक ध्यान कक्ष आहे, ज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी या चार प्रसिद्ध किल्ल्यांचे मॉडेल्स आहेत. मध्यभागी ध्यानस्थ अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.
PM Modi Inaugurates ₹13,430 Crore Projects in Kurnool; Declares 21st Century Belongs to India, Pushes ‘Aatmanirbhar Bharat’ Vision
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
- Supreme Court : दिल्ली-NCRमध्ये काही अटींसह17 ते 21 ऑक्टोबरपर्यंत ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी; CJI म्हणाले- संतुलित दृष्टिकोन हवा
- Shehbaz Sharif : ट्रम्प यांचे कौतुक केल्याने पाक PM देशातच ट्रोल; लोक म्हणाले- शरीफ यांना खुशामतीबद्दल नोबेल द्या, आपले नेते इतके चापलूस का?