• Download App
    ममतांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवर पीएम मोदी म्हणाले, खेळाडूने अंपायरवर टीका केली की समजा खेळ संपलाय! । PM Modi Criticizes Mamata Banerjee in Hugli Rally Over Her Allegations On EC

    ममतांच्या EC वरील आरोपांवर पीएम मोदी म्हणाले, प्लेयरने अंपायरवर टीका केली की समजा त्यांचा खेळ संपलाय!

    PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, जर क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू अंपायरला वारंवार जाब विचारत असेल, तर समजून घ्या की, त्याच्या खेळात दोष आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणीही जर निवडणूक आयोगाला, ईव्हीएमला दोष दिला तर समजून घ्या, त्यांचा खेळ संपलाय. PM Modi Criticizes Mamata Banerjee in Hugli Rally Over Her Allegations On EC


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की, जर क्रिकेटच्या मैदानात एखादा खेळाडू अंपायरला वारंवार जाब विचारत असेल, तर समजून घ्या की, त्याच्या खेळात दोष आहे. निवडणुकीच्या मैदानात कोणीही जर निवडणूक आयोगाला, ईव्हीएमला दोष दिला तर समजून घ्या, त्यांचा खेळ संपलाय.

    पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील एका निवडणूक रॅलीत म्हटले होते की, लोक पैशांनी भाजपच्या सभांमध्ये येत आहेत असा दावा करून दीदींनी लोकांच्या स्वाभिमानाला दुखावले. ते म्हणाले, “राजकीय स्वार्थासाठी तृणमूल कॉंग्रेसने सिंगूरकडे दुर्लक्ष केले, परिसरात कोणताही उद्योग नाही आणि शेतकरी नाराज आहेत.”

    पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

    • पश्चिम बंगालला काय हवे आहे, काय करावे याबद्दल बंगालच्या महान लोकांमध्ये कधीच गोंधळ उडालेला नाही. म्हणूनच बंगालच्या जनतेने निवडणुकांमध्ये नेहमीच स्पष्ट बहुमताला प्राधान्य दिले आहे. इथला बौद्धिक वर्ग, इथल्या अभ्यासू प्रतिभावंतांनी नेहमीच स्पष्ट विचारांना निवडले आहे.
    • बंगालचे लोक नेहमीच त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ज्यांनी बंगालच्या लोकांची उपेक्षा केली, त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत, ते अपयशी ठरले आहेत. बंगालचा विकास न करणारे लोक अपयशी ठरले, त्यांनी बंगालला अनेक वर्षे मागे लोटले. म्हणूनच आज बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा परिवर्तनाचा निश्चय केलाय. आशोल पोरिबर्तनच्या घोषणेत आणि शोनार बांगलाच्या दृष्टीने ही बंगालमधील लोकांची आकांक्षा आहे. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील मतदानातून त्यांनी भाजपच्या प्रचंड बहुमताचा मार्ग मोकळा केला आहे.
    • दोन दिवसांपूर्वी नंदीग्राममध्ये 2 मे रोजी काय निकाल लागणार आहेत, याची झलक आम्ही पाहिली आहे. मला खात्री आहे की, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात दीदींची चिडचिड वाढेल, माझ्यावर शिव्यांचा वर्षावही वाढेल.
    • बंगालला एक खास मधुरता आहे. इथल्या भाषेत गोडवा आहे. येथे बंधू-भगिनींच्या भावनेत गोडवा आहे, वागण्यात गोडपणा आहे. मिष्टी डोई आणि मिठाई तर बातच न्यारी! पण मग दीदींमध्ये एवढी कटुता कुठून येते?

    PM Modi Criticizes Mamata Banerjee in Hugli Rally Over Her Allegations On EC

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार