विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : कार्यक्षमता दाखविण्यासाठी चक्क पुरस्कार विकत घेण्याचा प्रकार पश्चिम बंगालमध्ये उघडकीस आला आहे. पश्चिम बंगालच्या शिक्षण व उच्च शिक्षण आणि पर्यटन या विभागांना स्कोच गोल्ड अवॉर्ड मिळाले आहे. परंतु, प्रदर्शनात १२ लाख रुपयांचा स्टॉल विकत घेतल्यावर कोणालाही हा पुरस्कार मिळतो,असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.Plan to pay Rs 12 lakh and get gold medal! Award received by the Government of West Bengal,
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शालेय व उच्च शिक्षण आणि पर्यटन विभागांनी स्कोच पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. मात्र, अधिकारी यांनी या पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग आणि पर्यटन विभाग या दोघांनीही प्रतिष्ठित स्कोच गोल्ड पुरस्कार जिंकले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी आणि सदस्यांचे हार्दिक अभिनंदन, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले होते. शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला
आणि कोविड-19 महामारीच्या काळात अध्यापन कार्यात अडथळे येऊ नयेत यासाठी शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील सर्वांचे प्रयत्न आणि सेवांचे कौतुक केले.मात्र, पुरस्कारांच्या विश्वासार्हतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अधिकारी म्हणाले काही सरकारी विभागांना नुकतेच तथाकथित प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत.
ते म्हणाले, जास्त खर्च केल्यावर मोठे पुरस्कार मिळतात. अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला पुरस्कार मिळाल्यासारखे वाटत आहे. अंतिम टप्प्यात स्वत:ला प्रदर्शित करण्यासाठी महागडे स्टॉल खरेदी केले की पुरस्कार दिले जातात. कौशल्य विकास विभागाने 2 लाखांचा स्टॉल विकत घेतला आणि सुवर्ण पुरस्कार मिळवला. कोणीतरी दोन लाखांचा स्टॉल विकत घेतला आणि त्याला सिल्व्हर अवॉर्ड किंवा ऑर्डर ऑफ मेरिट मिळाले.
Plan to pay Rs 12 lakh and get gold medal! Award received by the Government of West Bengal,
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी
ReplyReply allForward
|