• Download App
    Pakistan एकीकडे पाकिस्तानचे अनेक तुकडे स्वतंत्र व्हायच्या बेतात; दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांचीच निदान वेगळी राज्ये करायची मागणी!!

    एकीकडे पाकिस्तानचे अनेक तुकडे स्वतंत्र व्हायच्या बेतात; दुसरीकडे सत्ताधारी मंत्र्यांचीच निदान वेगळी राज्ये करायची मागणी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या रगड्यात आपल्या देशाचे तुकडे होतील, याची खात्री दहशतवादी देश पाकिस्तानला पटत चालली आहे, याची प्रत्यंतर त्यांच्या नॅशनल असेंबली मध्ये आले. पाकिस्तान या देशाचे तुकडे व्हायच्या आत निदान आहेत, त्या राज्यांचे तुकडे करून काही वेगळी राज्ये तरी निर्माण करा, अशी मागणी पाकिस्तानातल्या सत्ताधारी मंत्र्यांनीच शहाबाज शरीफ सरकारकडे केली. सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांच्या मागणीमुळे पाकिस्तानात आणि सत्ताधारी पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. Pakistan

    पाकिस्तानमधील अनेक भागात विकास होत नसल्याने असंतोषाचे लोण पसरले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत मतभेदांचे प्रदर्शन होते. त्यामुळे शहबाज शरीफ सरकारची चिंता वाढली आहे. शहबाज यांचा पक्ष PML-N आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा पक्ष PPP ने 2 वेगवेगळ्या प्रांताची मागणी केली.



    बिलावल भुट्टो यांच्या पक्षाच्या खासदाराने पंजाब, तर शहबाज सरकारमधील मंत्र्याने खैबर-पख्तूनख्वा या प्रांतांचे विभाजन करण्याची मागणी केली. “डॉन” या वृत्तपत्रानुसार, नॅशनल असम्बलीत अर्थसंकल्पावर बोलताना सरकारमधील धार्मिक खात्याचे केंद्रीय मंत्री सरदार मुहम्मद युसूफ यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये हजारा राज्य तयार करण्याची मागणी केली. खैबर या प्रांताला इमरान खान यांचा गड मानण्यात येतो.

    एका मंत्र्याने मागणी केल्यावर पीपीपीचे सय्यद मुर्तजा महमूद यांनी पंजाबच्या विभाजनाची मागणी केली. दक्षिण पंजाब हे स्वतंत्र राज्य करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे पाकिस्तानातले पंजाबचे अतिरिक्त वर्चस्व संपुष्टात येईल आणि पाकिस्तानात सर्व राज्यांना समान वागणूक मिळेल, असे ते म्हणाले.

    सध्या अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि गिलिगिट-बालिस्टान हे प्रांत आहेत. पीओके आणि इस्लामाबादला केंद्राच्या अखत्यारीत ठेवण्यात आले आहे. पंजाब पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. तर सिंध हा आर्थिकदृष्ट्या सर्वात सक्षम प्रांत मानण्यात येतो. बलूचिस्तान आणि खैबर हे दोन प्रांत पाकिस्तानातील सर्वात अशांत राज्ये मानण्यात येतात. बलूचिस्तान आणि खैबर या दोन्ही राज्यात स्वातंत्र्य चळवळीने उग्र रुप धारण केले आहे. खैबर प्रांताला विभाजीत करून हाजरा हा भाग वेगळा करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारमध्ये चिंता वाढली आहे.

    Pakistan on the verge of collapse and split

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारने घेतला मोठा निर्णय

    Operation Sindhu : ऑपरेशन सिंधू – २९० भारतीय विद्यार्थ्यांची दुसरी तुकडी इराणहून दिल्लीला पोहोचली

    Omar Abdullah : ‘अमेरिका एखाद्या मित्र तोपर्यंतच राहतो, जोपर्यंत…’ ; उमर अब्दुल्लांनी साधला निशाणा