UNGA मध्ये भारताने सांगितले वस्तूस्तिथी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावर भारताने आता प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी UNGA मध्ये उत्तर देण्याच्या अधिकारादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणाला विनोद म्हणून संबोधले. तसेच पाकिस्तानला दहशतवादाची फॅक्टरी म्हटले.
पाकिस्तानी पंतप्रधानांना प्रत्युत्तर देताना भाविका मंगलानंदन म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा वापर केला आहे. भाविका मंगलानंदन म्हणाल्या की, पाकिस्तानने जगात कुठेही हिंसाचाराच्या विरोधात बोलणे हा दांभिकपणा आहे.
भाविका मंगलानंदन म्हणाल्या, “आज सकाळी या विधानसभेत (यूएन) एक हास्यास्पद घटना घडली ही खेदाची बाब आहे. मी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या भाषणातील भारताच्या संदर्भाबाबत बोलत आहे. जगाला माहीत आहे की, पाकिस्तान त्याने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध सीमापार दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर केला आहे, आमच्या संसदेवर, आमच्या आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ला केला आहे, ही यादी पुढे आहे.
कुठेही हिंसाचारावर बोलणे हा पाकिस्तानचा सर्वात मोठा ढोंगीपणा असल्याचे भाविका मंगलानंदन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “दहशतवाद, अंमली पदार्थ, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेला लष्करी देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचे धाडस करतो.”
Pakistan is a factory of terrorism Indias comment in UNGA
महत्वाच्या बातम्या
- Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी
- Jagan Mohan Reddy : प्रसादाच्या लाडूतील भेसळीचा वाद अंगावर आला; जगन मोहन रेड्डींनी राजकीय नौटंकी करत तिरुपतीचा दौरा रद्द केला!!
- Indonesia : सोन्याच्या खाणीत खोदकाम करणे जीवावर बेतलं, दरड कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू
- Maharashtra : महाराष्ट्रातील 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मथुरेतून साधूच्या वेशात अटक