• Download App
    कोव्हक्सीन लसीचा एक डोस दोन डोस इतकाच प्रभावी; आयसीएमआरच्या संशोधनातून स्पष्ट। One dose of covacin vaccine is as effective as two doses; Clear from ICMR research

    कोव्हक्सीन लसीचा एक डोस दोन डोस इतकाच प्रभावी; आयसीएमआरच्या संशोधनातून स्पष्ट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताची स्वदेशी लस म्हणून कोव्हक्सीन ओळखली जाते. भारत बायोटेक्स निर्मित कोव्हक्सीन लसीचा एक डोस हा दोन डोस इतकाच प्रभावी असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनातून स्पष्ट झाले आहे. One dose of covacin vaccine is as effective as two doses; Clear from ICMR research

    कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला कोव्हक्सीन लसीचा एक डोस दिला आणि कोरोना न झालेल्या व्यक्तीला दोन डोस दिले. तेव्हा दोघांमध्ये तितक्याच प्रमाणात कोरोना प्रतिबंधक अँटिबॉडी तयार झाल्याचे आयसीएमआरच्या संशोधनात स्पष्ट झाले.



    या संशोधनाचा अहवाल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ मध्ये या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. अर्थात केलेले हे संशोधन प्राथमिक टप्प्यात मिळालेल्या डेटावर आधारित आहे. दुसरीकडे जानेवारीत लसीला तातडीच्या वापराची परवानगी मिळाल्यानंतर ‘ बीबीव्ही १५२’ म्हणजेच कोव्हक्सीनचे दोन डोस चार ते सहा आठवड्याच्या कालावधीत दिले जात आहेत.

    लस दिलेल्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटिबॉडीजचे प्रमाण पाहण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर २८ आणि ५६ दिवसांनी अशा चाचण्या घेण्यात आल्या. फेब्रुवारी ते मे या कालावधीत चेन्नई येथे आरोग्य लस घेतलेल्या ११४ कर्मचाऱ्यांमधील अँटिबॉडीजची चाचणी घेतली. तेव्हा त्यातील निष्कर्ष हे देशातील लसीकरण धोरणासाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

    One dose of covacin vaccine is as effective as two doses; Clear from ICMR research

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप