पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग आळवला आहे.On the occasion of Mamata’s victory, Raj Thackeray lamented the anger of the states over their autonomy
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग आळवला आहे.
राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे ट्विरवरून अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनजीर्चं अत्यंत मनापासून अभिनंदन!
संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघषाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे.
त्यामुळेच राज्यांची स्वायत्ता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तु्म्ही बनाल आणि सर्वसमावेश भूमिका घेत
पश्चिम बंगालचा विकास साधाला अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन.राज ठाकरे यांनी यापूर्वीही ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचे कौतुक केले होते.
त्यांनी २०१९ मध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. इव्हीएमविरोधात सुरू केलेल्या आपल्या आंदोलनात ममता बॅनर्जी यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी भेट घेतली होती. त्यांना मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाासाठी निमंत्रणही दिले होते.
On the occasion of Mamata’s victory, Raj Thackeray lamented the anger of the states over their autonomy
महत्त्वाच्या बातम्या
- आसाममध्ये या माणसाची साथ पडली कॉँग्रेसला महागात
- बांधकाम मजुराची बायको भाजपामुळे बनली आमदार, झोपडीत राहणाऱ्या चंदना बाऊरी यांचा विजय
- देशाच्या राजकीय नकाशामध्ये भाजपचे वर्चस्व, पुडूचेरीच्या विजयामुळे 18 राज्ये एनडीएकडे : इंदिरांजींच्या काळात 17 राज्यात होती काँग्रेस
- पंढरपूरचा विजय हा मविआच्या भ्रष्टाचारी-भोंगळ कारभाराला आरसा दाखविणारा ; देवेंद्र फडणवीस
- 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेसने पराभव केला मान्य, राहुल गांधी म्हणाले- आम्ही लढतच राहू!