• Download App
    इंडियाच्या बैठकीसाठी जाताना लालू पत्रकारांना म्हणाले- मोदींच्या मानगुटीवर बसायला चाललोय|On his way to the India meeting, Lalu told the reporters - he is going to sit on Modi's neck

    इंडियाच्या बैठकीसाठी जाताना लालू पत्रकारांना म्हणाले- मोदींच्या मानगुटीवर बसायला चाललोय

    प्रतिनिधी

    पाटणा : RJD प्रमुख लालू प्रसाद यादव मंगळवारी इंडियाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी तेजस्वी यादव यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले. पाटणा विमानतळावर पत्रकारांनी त्यांना विचारले की, तुम्ही मुंबईला जात आहात. यावर लालू म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या मानगुटीवर बसायला चाललोय.On his way to the India meeting, Lalu told the reporters – he is going to sit on Modi’s neck

    मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी मुंबईला येणार आहेत. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव मुंबईत डॉक्टरांची भेट घेतील आणि आरोग्य तपासणी करतील. याशिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीची रणनीती ते तयार करणार आहेत.



    उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, जनता आमच्या आघाडीच्या पाठीशी सर्व प्रकारे उभी आहे. जातनिहाय जनगणनेविषयी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रतिज्ञापत्र रातोरात बदलले जाते. जात सर्वेक्षण व्हावे, असे भाजपला कधीच वाटले नाही. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. या गोष्टींवरून भाजप घाबरल्याचे दिसून येते.

    दुसरीकडे गुजरातींना ठग म्हटल्याप्रकरणी न्यायालयातून समन्स बजावण्यात आल्यावर ते म्हणाले की, हे सर्व सुरू आहे. याचे उत्तर न्यायालयात देऊ.

    31 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक

    31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीच्या समन्वयकांची घोषणा होणार आहे. तसेच, समन्वय समितीची स्थापना, सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामील असलेल्या सर्व पक्षांमध्ये संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला यावरही चर्चा होऊ शकते. नितीश कुमार यांना संयोजक केले जाणार असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे.

    सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना नितीशकुमार यांनी समन्वयक होण्यास नकार दिला. मला काहीही बनायचे नाही, असे ते म्हणाले होते. फक्त सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे.

    On his way to the India meeting, Lalu told the reporters – he is going to sit on Modi’s neck

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Himanta Biswa Sarma : काँग्रेसने म्हटले- आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे 3 पासपोर्ट; विचारले- 52,000 कोटी कुठून आले; सरमा यांचे उत्तर- मानहानीचा खटला दाखल करू

    नरेंदर कब मिलेगा सिलेंडर??, वंचित बहुजन आघाडीचे उद्या 6 एप्रिलला महाराष्ट्रात आंदोलन

    Jyotiraditya Scindia : देशात उत्पन्नाच्या 40% पर्यंत स्मार्टफोनचा खर्च पोहोचला; केवळ 5% असावा, महागाईमुळे 22 कोटी वापरकर्त्यांचे स्मार्टफोन अपग्रेड थांबले