वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असे सांगत आज सर्वोच्च न्यायालयाने नुकसानभरपाईचा विचारही करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. Not every death in the corona can be called medical negligence; The Supreme Court also refused to consider Indemnity
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यातील अनेक मृत्यू हे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाले, असा दावा करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. या प्रकरणी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, कोरोना झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच झाला, असे म्हणता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़, न्यायमूर्ति विक्रम नाथ और न्यायमूर्ति हेमा कोहली यांच्या पीठाने या संदर्भात निकाल दिला आहे. याचिकाकर्ते दीपक राज सिंह यांना त्यांच्या सूचना सक्षम अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असेही सांगितले आहे.
न्यायमूर्ती यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णाचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच झाला, असे समजून प्रत्येकाला नुकसान भरपाई कशी काय देता येईल ?याचिकाकर्त्याच्या मुद्याशी न्यायालाय असहमत आहे.
मानवतेच्या दृष्टीने सानुग्रह अनुदानाचा मुद्दा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टीने सहा आठवड्यात योग्य ती नियमावली तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण हे आदेश संपूर्णतः मानवतेच्या दृष्टिकोनातून दिले आहेत. त्यामागे वैद्यकीय निष्काळजीपणाचा मुद्दा नाही आहे. सरकारने याबाबत ठोस नीती जाहीर केलेली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याने आपल्या सूचना या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची गरज आहे.
Not every death in the corona can be called medical negligence; The Supreme Court also refused to consider Indemnity
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिंग्यांचा कर्दनकाळ, कट्टर मुस्लिमविरोधी बौध्द भिक्षू, फेस ऑफ बौध्द टेरर विराथू यांची कारागृहातून सुटका
- सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची तयारी
- अर्थव्यवस्था कात टाकतेय, नोकरदारांसाठी अच्छे दिन, २०२२ मध्ये मिळणार सरासरी ९.४ टक्के वेतनवाढ
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेनेला दिल्लीतून डिवचले; बेळगावच्या निवडणुकीची मुंबईत नक्की पुनरावृत्ती