• Download App
    भारताला जागतिक महाशक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची - पंतप्रधान मोदी|Next five years important to make India a global superpower PM Modi

    भारताला जागतिक महाशक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची – पंतप्रधान मोदी

    भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि यावर्षी …असंही मोदींनीस सांगितलं आहे.


    विशेष प्रतिनिधी

    दमोह : आपला शेजारी देश दहशतवादाचा पुरवठा करणारा आहे आणि आजकाल अन्नासाठी संघर्ष करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, जगातील अनेक देशांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.Next five years important to make India a global superpower PM Modi

    मध्य प्रदेशातील दमोह येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवल्याचाही उल्लेख केला.



    ते म्हणाले की, एकेकाळी भारत आपली बहुतांश शस्त्रे परदेशातून विकत घेत असे आणि आता भारत इतर देशांना उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे निर्यात करत आहे. भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि यावर्षी इतर देशांना 21,000 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे निर्यात करण्याची तयारी करत आहे.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रथम राष्ट्र या तत्त्वावर काम करत आहे. ते म्हणाले की, आपले सरकार कधीही कोणाच्या दबावाखाली येत नाही आणि कोणाच्याही पुढे झुकत नाही. आपल्या रॅलीत लोकांना संबोधित करताना, त्यांनी जोर दिला की देशाला एक मोठी जागतिक शक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत.

    Next five years important to make India a global superpower PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovpreet Singh : लवप्रीतची CWG मध्ये रौप्य पदकावर मोहोर; वेटलिफ्टिंगमध्ये 388 किलो वजन उचलले; डिस्कस थ्रोमध्ये सीमाला कांस्यपदक

    Manmohan Singh : कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांवरील खटला बंद; सुप्रीम कोर्टाची CBI क्लोजरला मंजुरी

    धर्मांतर केल्यास ‘अनुसूचित जाती’ (SC) दर्जा आणि आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका!!