• Download App
    भारताला जागतिक महाशक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची - पंतप्रधान मोदी|Next five years important to make India a global superpower PM Modi

    भारताला जागतिक महाशक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची – पंतप्रधान मोदी

    भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि यावर्षी …असंही मोदींनीस सांगितलं आहे.


    विशेष प्रतिनिधी

    दमोह : आपला शेजारी देश दहशतवादाचा पुरवठा करणारा आहे आणि आजकाल अन्नासाठी संघर्ष करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, जगातील अनेक देशांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.Next five years important to make India a global superpower PM Modi

    मध्य प्रदेशातील दमोह येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना त्यांनी फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवल्याचाही उल्लेख केला.



    ते म्हणाले की, एकेकाळी भारत आपली बहुतांश शस्त्रे परदेशातून विकत घेत असे आणि आता भारत इतर देशांना उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे निर्यात करत आहे. भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि यावर्षी इतर देशांना 21,000 कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे निर्यात करण्याची तयारी करत आहे.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रथम राष्ट्र या तत्त्वावर काम करत आहे. ते म्हणाले की, आपले सरकार कधीही कोणाच्या दबावाखाली येत नाही आणि कोणाच्याही पुढे झुकत नाही. आपल्या रॅलीत लोकांना संबोधित करताना, त्यांनी जोर दिला की देशाला एक मोठी जागतिक शक्ती बनवण्यासाठी पुढील पाच वर्षे महत्त्वाची आहेत.

    Next five years important to make India a global superpower PM Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Air India : एअर इंडिया जगातील चौथी वेळेवर धावणारी एअरलाइन बनली; जूनमध्ये 86.85% विमाने वेळेवर पोहोचली

    West Bengal Politics : TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील; सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजीनामा दिला होता

    Mamata’s : ममता टीएमसीच्या बँक खात्यांमधून मर्यादित व्यवहार करू शकतील; उच्च न्यायालयाने निरीक्षणासाठी विशेष अधिकारी नियुक्त केला