• Download App
    अयोध्या वादावर 'NCERT'च्या नव्या पुस्तकातील मजकूर बदलला, 'बाबरी मशीद'चं नाव हटवलं!|NCERT book content changed on Ayodhya dispute

    अयोध्या वादावर ‘NCERT’च्या नव्या पुस्तकातील मजकूर बदलला, ‘बाबरी मशीद’चं नाव हटवलं!

    राम मंदिर उभारणीच्या संघर्षाची कहाणी समाविष्ट करण्यात आली


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : NCERT च्या बारावीच्या नवीन सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशिदीचे नाव हटवण्यात आले आहे. आता नवीन पुस्तकात तिचे वर्णन तीन घुमट रचना असे करण्यात आले आहे. अयोध्येचा अध्याय चार पानांवरून फक्त दोन करण्यात आला आहे. यामध्ये राम मंदिर उभारणीच्या संघर्षाची कहाणी समाविष्ट करण्यात आली आहे.NCERT book content changed on Ayodhya dispute

    सोमनाथची रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, अयोध्येतील हिंसाचार यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुन्या पुस्तकात 16व्या शतकात मुघल सम्राट बाबरचा कमांडर मीर बाकी याने बाबरी मशीद बांधली होती असे सांगण्यात आले आहे.



    नवीन पुस्तकात म्हटले आहे की 1986 मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने तीन घुमट संरचना उघडण्याचे आदेश दिले. लोकांना पूजा करण्याची परवानगी मिळाली. असे सांगितले जात होते की ही तीन घुमट रचना प्रभू रामाच्या जन्मस्थानी बांधण्यात आली होती.

    अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा नव्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. 9 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायालयाच्या संवैधानिक खंडपीठाने ही जागा मंदिराची असल्याचा निकाल दिला. जुन्या पुस्तकात वर्तमानपत्राच्या कात्रणाची चित्रे लावली होती.

    यामध्ये बाबरी विध्वंसानंतरचे कल्याण सिंह सरकार हटवण्याच्या आदेशाचा समावेश होता. तो आता काढण्यात आला आहे. 2014 नंतर NCERT चे पुस्तक बदलण्याची ही चौथी वेळ आहे. एप्रिलमध्ये एनसीईआरटीने म्हटले होते की ताज्या घडामोडींच्या आधारे अध्यायात बदल करण्यात आले आहेत. त्यात नवीन माहिती समाविष्ट केली आहे.

    NCERT book content changed on Ayodhya dispute

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही