जम्मू-काश्मीरची जनता आता या तिन्ही कुटुंबाच्या ताब्यात राहणार नाही. Narendra Modi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Narendra Modi जम्मू-काश्मीरमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. या कालावधीत बुधवारी 24 जागांवर मतदान झाले. या जागांवर सुमारे 61.3 टक्के मतदान झाले. गेल्या सात निवडणुकांच्या तुलनेत येथे सर्वाधिक मतदान झाले.
आता सर्वच राजकीय पक्ष दुसऱ्या टप्प्याच्या तयारीत व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित केले. येथे पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये पहिल्यांदाच दहशतवादाच्या छायेत मतदान झाले आहे.
Donald Trump : मोदींचा अमेरिकेतही जलवा; डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचारादरम्यान म्हणाले…
श्रीनगरमधील रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी बंपर मतदानाबद्दल जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’वर प्रत्युत्तर देत म्हटले की, “या लोकांनी द्वेषाचे दुकान उघडले आहे. शाळा जळत राहिल्या, तरुण शिक्षणापासून वंचित राहिले आणि त्यांच्या हातून दगडफेक करण्यात आली.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी यापूर्वीही म्हटले होते की, तीन कुटुंबांनी काश्मीर उद्ध्वस्त केले आहे. आता ते अस्वस्थ आहेत. या कुटुंबांना जम्मू-काश्मीर लुटण्याचा अधिकार आहे, असे वाटते. पण आता जम्मू-काश्मीर या कुटुंबांच्या ताब्यात रहाणारन नाही.”
Narendra Modi thanked the people for the bumper voting in the Jammu and Kashmir election
महत्वाच्या बातम्या
- Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मनातल्या मुख्यमंत्र्यांची जोरदार स्पर्धा; पण नाव जाहीर करण्याची कुणाचीही हिंमतच होईना!!
- Hockey : चिनी भूमीवर चीनवर मात करून भारत हॉकीत एशियन चॅम्पियन; ऑलिंपिकचे तिकीट निश्चित!!
- Adani Green Energy : अदानी ग्रीन एनर्जी महाराष्ट्र सरकारला 6600 मेगावॅट वीज पुरवेल