विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : तेलगू देशम पार्टीचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे पुत्र आणि चित्रपट निर्माते नंदामुरी बालकृष्ण यांनी भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत.N. T. Rama Rao’s son Nandamuri Balakrishna’s said Bharat Ratna does not even have my father’s nails, doesn’t know who A. R. Rehman
एन. टी. रामाराव यांच्या नखाचीही सर भारतरत्न पुरस्काराला नसल्याचे बरळतानाच संगीतकार ए. आर. रेहमान कोण, त्याला मी ओळख नाही असे त्यांनी म्हटले आहे.
एका तेलगू चित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नंदामुरी म्हणाले, ए. आर. रेहमान कोण? त्याला मी ओळख नाही. दशकातून एकदा तो काम करतो आणि ऑस्कर पुरस्कार मिळवितो. त्याला माझ्या लेखी काडीचीही किंमत नाही.
केवळ ऑस्करच नाही तर भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मानत नाही. हा प्रतिष्ठित पुरस्कार माझे दिवंगत वडील एनटी रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता. त्याला त्यांच्या नखाचीही सर नाही. तेलगू चित्रपटात माझ्या कुटुंबाच्या योगदानाची भरपाई कोणताही पुरस्कार करू शकत नाही.
हॉलीवूडचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनपेक्षा आपण मोठे आहोत असे सांगत नंदामुरी म्हणाले, कॅमेरॉन यांना एक चित्रपट करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मी ज्या पध्दतीने काम करतो त्यामुळे कमी वेळात जास्त हिट चित्रपट तयार होतात.
नंदमुरी बाळकृष्ण यांची वाद घालण्याची ही पहिली वेळ नाही. एका चाहत्याला त्याने थप्पडही लगावली होती. ए. आर. रेहमान याला ओळखत नसल्याचे ते म्हणत असतील तरी १९९३ मध्ये रेहमान यांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले होते.
N. T. Rama Rao’s son Nandamuri Balakrishna’s said Bharat Ratna does not even have my father’s nails, doesn’t know who A. R. Rehman
महत्त्वाच्या बातम्या
- राज कुंद्राचं पॉर्नचं साम्राज्य : दिवसाला 20 हजार रुपये किरायाने घ्यायचे बंगला, 20 ते 25 वर्षांच्या स्ट्रगलिंग अभिनेत्रींना ओढायचे जाळ्यात
- राज कुंद्रा पॉर्न प्रकरणात पूनम पांडे अन् शर्लिन चोप्राची एंट्री, तर कंगना बॉलीवुडला म्हणाली गटार
- MISS INDIA USA 2021 : जाणून घ्या कोण आहेत वैदेही डोंगरे, ज्यांनी जिंकला ‘मिस इंडिया यूएसए 2021’चा किताब
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू