• Download App
    'रामज्योती' आणण्यासाठी मुस्लीम महिला अयोध्येला रवानाMuslim women leave for Ayodhya to bring Ramjyoti

    ‘रामज्योती’ आणण्यासाठी मुस्लीम महिला अयोध्येला रवाना

    22 जानेवारी रोजी मुस्लिमांच्याही घरी रामज्योती पेटणार Muslim women leave for Ayodhya to bring Ramjyoti

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : रामनगरी अयोध्येतील जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या रामलल्लाच्या भव्य मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत मुस्लिम महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नाजनीन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली रामपंथाची रामज्योती यात्रा शनिवारी लम्ही येथील सुभाष भवन येथून अयोध्येकडे रवाना झाली.

    पातालपुरी मठाचे महंत बालक दास यांनी नाजनीन अन्सारी यांना राम झेंडा देऊन यात्रा समुहाला हिरवी झेंडी दिली. नाजनीन अन्सारी आणि डॉ. नजमा परवीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 22 जानेवारीला रामज्योती पेटवण्याच्या आवाहनानंतर अयोध्येतून रामज्योती आणण्याचा निर्णय घेतला. यासाठी रामपंथतर्फे रामज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

    फाउंडेशनच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टीममध्ये नाजनीन अन्सारी, डॉ. नजमा परवीन, ताजीम भारतवंशी, रोजा भारतवंशी, अफरोज खान यांचा समावेश आहे. नाजनीन अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली रामज्योती यात्रा जौनपूर आणि अकबरपूरमार्गे अयोध्येत पोहोचेल, तिथे साकेत भूषण श्री राम मंदिराचे पीठाधीश्‍वर, महंत शंभू देवाचार्य रामज्योतीचे पूजन करतील.

    श्री राम मंदिर आणि हनुमान गढीला भेट दिल्यानंतर नाजनीन अन्सारी रविवारी रामज्योतीसह सुभाष भवनात परततील, जेथे पूर्वांचलचे शेकडो मुस्लिम त्यांचे स्वागत करण्यासाठी जमतील. चांदवाक येथे विशाल भारत संस्थेचे जौनपूर जिल्हा अध्यक्ष नौशाद अहमद दुबे यांच्या हस्ते रामज्योती यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. वाटेत विविध ठिकाणी त्यांचे स्वागत होईल.

    Muslim women leave for Ayodhya to bring Ramjyoti

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohingya : बंगालच्या उपसागरात दोन बोटी बुडाल्या, 500 मृत्यूंची शंका; बहुतेक रोहिंग्या प्रवासी होते, खराब हवामानामुळे अपघात

    Sant Rampal’ : रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते; रामाने चोरांना बाण का मारला नाही

    Sonam Wangchuk : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- प्रत्येक जीव महत्त्वाचा; केंद्र-दिल्ली सरकारने दररोज वैद्यकीय तपासणी करावी