विशेष प्रतिनिधी
मुबंई : नवाब मलिक यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये अापले मत मांडले आहे. नवाब मलिक म्हणतात, गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी कधीही होणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होती आणि राहील. मुंबईमध्ये बरेच मोठमोठे राजकारणी आले पण कोणीही महाराष्ट्रातील व्यापार पळवण्याचे काम केले नाही असे ते म्हणाले.
Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik
पुढे ते म्हणतात की, मोदी सरकार सत्तेत येऊन सात वर्ष झालेली आहेत. उद्योग आस्थापन मुंबईमध्ये न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे होतील? असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदी यांचे आदेश आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होकार यामुळे महाराष्ट्राचे बरेच मोठे नुकसान झालेले आहे, त्यामुळे जे लोक बोट दाखवत आहेत त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
भाजप विरोधकांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणतात की, शरद पवार हे चाणक्य आहेत. हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. याची चिंता भाजपला लागली आहे. परंतु आजही भाजप आमच्यात कशी फूट पडेल हे बघत आहेत. मात्र त्यांनी गोव्यामधील लक्ष द्यावे, आमची चिंता करू नये. असे देखील मलिक यांनी सांगितले आहे.
Mumbai will be the financial capital of the country, not Gandhinagar; Minority Minister Nawab Malik
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! महाराष्ट्रातील ५० हजार गावात आरोग्य यंत्रणाच नाही !औरंगाबाद खंडपीठात बबनराव लोणीकरांनी केली याचिका दाखल
- ममता बॅनर्जी – भूपेंद्र पटेल; एकीकडे राजकीय गाजावाजा; दुसरीकडे आर्थिक गुंतवणुकीला हवा!!
- राज्यावर घोंगवतेय ‘जोवाड’ चक्रिवादळ; अवकाळीमुळं पिकांचंही मोठं नुकसान
- कोरोना संसर्गाची माहिती लपविल्याबद्दल ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड
- म्यानमारमधील लोकांची अवस्था बिकट, संयुक्त राष्ट्रांकडून मदतीचे आवाहन
- अफवा, दिशाभूल करणारी माहिती रोखण्यासाठी ‘ट्विटर’ने उचलले नवे पाउल, वर लवकरच दिसणार नवी रचना असलेले लेबल
- २०१४ नंतर भारत बनला अमेरिकेचा गुलाम – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर यांचा हल्लाबोल