30 जुलै रोजी केरळमध्ये भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
विशेष प्रतिनिधी
वायनाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केरळमधील वायनाड येथे पोहोचले. जिथे त्यांनी भूस्खलनग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसानंतर केरळच्या वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते. त्यामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाड गाठून आपत्तीग्रस्त भागाला भेट दिली. शनिवारी पंतप्रधान मोदींनी भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून चुरमाला, मुंडक्काई आणि पंचरीमट्टम या भूस्खलनग्रस्त वसाहतींचे हवाई सर्वेक्षण केले, त्यानंतर ते सकाळी 11.15 वाजता कन्नूर विमानतळावरून वायनाडला रवाना झाले.
यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि केंद्रीय पर्यटन आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हेही उपस्थित होते. आपत्तीग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर पंतप्रधान मोदी कालपेट्टा येथील एसकेएमजे उच्च माध्यमिक विद्यालयात पोहोचले. यानंतर त्यांनी रस्त्याने भूस्खलनग्रस्त भागांना भेट दिली.
मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा केरळ सरकारने आपत्तीग्रस्त भागातील पुनर्वसन आणि मदत कार्यासाठी केंद्राकडे 2,000 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. 30 जुलै रोजी दक्षिणेकडील केरळ राज्यात भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. केरळमध्ये अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.
Modi conducted an aerial survey in Wayanad
महत्वाच्या बातम्या
- Waqf Bill : 99 % जमीन गुंडांच्या ताब्यात; मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचा घणाघात; संघाला मशिदी ताब्यात घ्यायच्यात; ओवैसींचा कांगावा!!
- India hockey Team : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, स्पेनला हरवून हॉकीमध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले
- Eknath Shinde : बांगलादेश हिंसाचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा!
- Vinesh Phogat : विनेश फोगटला अजूनही जिंकू शकते रौप्यपदक?, CAS लवकरच निर्णय देणार!