मुंबईच्या बैठकीत यावर सहमती झाली होती का…? असा सवाल भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली आहे. यावरून आता भाजपाने आक्रमक होत विरोधी आघाडीवर हल्लाबोल. MK Stalins sons statement on Sanatism, BJP attacked the opposition front
”डास, डेंग्यू, ताप, मलेरिया आणि कोरोना, या अशा काही गोष्टी आहेत, ज्यांना केवळ विरोधच करून उपयोग नाही, तर त्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे. सनातन धर्मही असाच आहे. तो दूर करणे हे आपले पहिले काम असले पाहिजे. त्यावर भाजपा नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.” असं उदयनिधी म्हणाले आहेत. यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या विधानावर विरोधी आघाडीला घेरले आहे.
उदयनिधींच्या या विधानाने सोशल मीडियावरही नव्या वादाला सुरुवात झाली आहे, गुन्हा दाखल करण्याची मागणीही अनेकांनी केली आहे. भाजपाचे अमित मालवीय म्हणाले, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा संबंध मलेरिया आणि डेंग्यूशी जोडला आहे. केवळ विरोध न करता ते नष्ट केले पाहिजे, असे त्यांचे मत आहे.” ते सनातन धर्माचे पालन करणार्या भारतातील 80 टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराची हाक देत आहे. द्रमुक हा विरोधी आघाडीचा प्रमुख सदस्य आणि काँग्रेसचा दीर्घकाळ सहयोगी आहे. मुंबईच्या बैठकीत यावर सहमती झाली होती का…?”
अमित मालवीय पुढे म्हणाले, “राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकांन’बद्दल बोलतात, पण काँग्रेसचे सहयोगी द्रमुक सनातन धर्म नष्ट करण्याबद्दल बोलतात. काँग्रेसचे मौन हे नरसंहाराच्या या आवाहनाचे समर्थन आहे. इंडिया अलायन्स संधी मिळाल्यास भारताची सहस्राब्दी जुनी सभ्यताही नष्ट करेल. विरोधी आघाडी ‘इंडिया’चा सदस्य असलेल्या द्रमुकने नुकतीच मुंबईत इतर विरोधी नेत्यांची भेट घेऊन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली आहे.
MK Stalins sons statement on Sanatism BJP attacked the opposition front
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ