न्यूयॉर्क – सध्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या रचनेमध्ये जगाचे बदलेले वास्तव प्रतिबिंबीत होत नाही, या रचनेत सुधारणा करण्याची नितांत आवश्येकता असून काही निवडक देश त्यात अडथळा आणत आहेत, अशी टीका परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. Menakshi Lekhi says try to expand Un council
एका मुलाखतीदरम्यान त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना होऊन ७५ वर्षे झाली आहेत. मात्र, या संस्थेच्या रचनेत, विशेषत: सुरक्षा समितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. यामुळे या संस्थेचाच जीव गुदमरत आहे. मानवतेच्या भल्यासाठी काम करण्यावर भारताचा विश्वा स असून आम्ही कायमच मैत्री आणि सहकार्यासाठी तयार आहोत. लेखी या सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
भारतीय वकीलातीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मीनाक्षी लेखी यांनी अमेरिकेतील भारतीयांचे कौतुक केले. ‘‘येथील भारतीयांनी त्यांनी स्वीकारलेल्या देशाच्या भल्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भारतीय जेथे राहतात, त्या समुदायामध्ये मिसळून जातात. मानवजातीच्या कल्याणासाठी काम करण्यावर आपला विश्वाेस असतो. भारत कायमच शांततेचा आणि सर्वांच्या विकासाचा समर्थक देश राहिला आहे.
Menakshi Lekhi says try to expand Un council
महत्त्वाच्या बातम्या
- UNSC मध्ये भारताने स्पष्टपणे सांगितले : अफगाण जमीन कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी वापरू नये
- महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव
- देशातील चार नवीन विमानतळापैकी दोन महाराष्ट्रात : ज्योतिरादित्य सिंधिया; महाराष्ट्रात गोंदिया आणि सिंधदुर्गमध्ये साकारणार