विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – ओडिशात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले असून महानदीची पातळी वेगाने वाढत चालली आहे. चोवीस जिल्ह्यात पूरस्थिती असून आतापर्यंत साडेसात हजाराहून अधिक घरांची पडझड झाली आहे. गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. Massive flood in Odisha
काल सायंकाळी सहापर्यंत आखुआपदा येथे वैतरणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मथनी येथे जलका नदीची पातळी देखील वाढली आहे. तसेच वरच्या भागात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले आहेत. सलग पावसामुळे २४ जिल्ह्यांना फटका बसला असून ७ हजार ५४० घरांची पडझड झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे निर्माण झालेला प्रभाव कमी झाला असला तरी सलग तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काल राज्यातील १२ जिल्ह्यात २३ ब्लॉकमध्ये ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Massive flood in Odisha
महत्त्वाच्या बातम्या
- जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदी, आदर पूनावाला, ममता बॅनर्जी यांचेही नाव
- अनिल देशमुख यांचे तत्कालिन खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित, शंभर कोटींच्या प्रकरणात होते कोठडीत
- मोठी बातमी : भारताचे स्टॉक मार्केट जगातील 5वे सर्वात मोठे, BSE लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य 260 लाख कोटी रुपयांवर
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड