• Download App
    Maharashtra महाराष्ट्रात 'या' दोन नेत्यांनी भाजपच्या प्रचंड

    Maharashtra : महाराष्ट्रात ‘या’ दोन नेत्यांनी भाजपच्या प्रचंड विजयात बजावली महत्त्वाची भूमिका

    Maharashtra

    मध्य प्रदेशातही त्यांनी घडवला आहे चमत्कार.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Maharashtra  मध्य प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही पक्षाचा विजय निश्चित करण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या वर्षी यादव-वैष्णव जोडीला मध्य प्रदेशात भाजपच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. राज्यातील 230 पैकी 163 जागा जिंकून पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली.Maharashtra



    महाराष्ट्रातील भाजपच्या निवडणूक प्रचाराची कमानही यादव आणि वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाच्या खराब कामगिरीनंतर, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी अनेक महिने राज्यात तळ ठोकला.

    मतमोजणीचे ट्रेंड समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांचे अभिनंदन केले आणि महायुती (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती) ला दणदणीत विजयाचे संकेत दिले. महाराष्ट्रात भाजपने 132 जागा जिंकल्या, ही त्यांची विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र, एप्रिल-मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले होते, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जागांवर विजय मिळवला होता.

    Maharashtra these both leaders play important role in BJPs victory

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : निवडणूक आयोगाने म्हणाले- दावे खरे, तर राहुल यांनी सही करावी; अन्यथा देशाची माफी मागावी

    भारतीय हवाई दल प्रमुखांनी ट्रम्पच्या जखमेवर मीठ चोळले; भारताने पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे सांगितले!!

    Amit Shah : SIR वर शहा म्हणाले- घुसखोर हे महाआघाडीची मतपेढी; जो भारतात जन्मला नाही, त्याला मतदानाचा अधिकारही नाही