विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून कोट्यवधी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देशात ५५ कोटी ४७ लाख ३० हजार नागरिकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. केरळमधील वायनाड, दीव-दमण, भुवनेश्वर व लडाख या चार शहरांनी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.Maharashtra is on top in vaccination
या चार ठिकाणच्या सर्वच्या सर्व नागरिकांनी किमान एक तरी डोस घेतला आहे.देशातील एकूण लोकसंख्येच्या ३२.४ टक्के लोकांना एक डोस देण्यात आला असून ९.१ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले, की भारताने एका दिवसात ८८ लाख लसीकरणाचा विक्रम मंगळवारी केला असून लसीकरणाचा वेग वाढल्याचे हे निदर्शक आहे.आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतच्या सर्वाधिक लसीकरणाबाबत उत्तर प्रदेश पहिल्या व महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
उत्तर प्रदेशात आतापावेतो ५ कोटी ९८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र एकूण लोकसंख्या व लसीकरण यांचे गुणोत्तर लक्षात घेतले तर उत्तर प्रदेश लसीकरणात सर्वांत पिछाडीवर असलेल्या राज्यांत गणला जातो. कारण तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ३१ टक्के नागरिकांना किमान एक डोस दिला गेला आहे.
Maharashtra is on top in vaccination
महत्वाच्या बातम्या
- ट्विटरने झटका दिल्यावर आता फेसबुकचीही राहूल गांधींना नोटीस, इन्स्टाग्रामवरील ती पोस्ट त्वरित हटविण्याचे आदेश
- आंध्र प्रदेश सरकारची लपवालपवी, आता सरकारी आदेश, अध्यादेश वेबसाईटवर टाकणार नाही
- डाव्या आघाडीच्या राजकारणामुळे केरळमध्ये कोरोना वाढतोय, महिलांवरील हिंसाचार आणि दहशतवादाचे केंद्र बनतोय, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हल्लाबोल
- तालीबानची सत्ता आल्यावर अफगाणी चलनात विक्रमी घसरण, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नरही गेले पळून