• Download App
    Lok Sabha लोकसभेत राज्यघटनेवर दोन दिवसीय चर्चा; राजनाथ सिंह

    Lok Sabha : लोकसभेत राज्यघटनेवर दोन दिवसीय चर्चा; राजनाथ सिंह म्हणाले, काही लोकांनी…

    Lok Sabha

    या चर्चेत भाजपचे 12 ते 15 नेते सहभागी होणार आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Lok Sabha लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधानावर चर्चा सुरू केली आहे. ही चर्चा दोन दिवस सुरू राहणार आहे. राज्यघटनेवर चर्चेला सुरुवात करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही भारतीय जनतेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली होती.Lok Sabha



    संविधानाच्या स्वीकाराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी या सभागृहाचे आणि देशातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, आपली राज्यघटना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातील सर्व घटकांना स्पर्श करून राष्ट्र उभारणीचा मार्ग प्रशस्त करते. संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून राष्ट्र उभारणीचा मार्ग निश्चित करते. जनतेच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे.

    राज्यघटनेवरील ही चर्चा शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या चर्चेला उत्तर देणार आहेत. या चर्चेत भाजपचे 12 ते 15 नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर नेते संविधानावर बोलणार आहेत.

    Lok Sabha two day discussion on the Constitution

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये