या चर्चेत भाजपचे 12 ते 15 नेते सहभागी होणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Lok Sabha लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संविधानावर चर्चा सुरू केली आहे. ही चर्चा दोन दिवस सुरू राहणार आहे. राज्यघटनेवर चर्चेला सुरुवात करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही भारतीय जनतेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारली होती.Lok Sabha
संविधानाच्या स्वीकाराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी या सभागृहाचे आणि देशातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ते म्हणाले की, आपली राज्यघटना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातील सर्व घटकांना स्पर्श करून राष्ट्र उभारणीचा मार्ग प्रशस्त करते. संविधान हे केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून राष्ट्र उभारणीचा मार्ग निश्चित करते. जनतेच्या आशा-आकांक्षांचे ते प्रतिबिंब आहे.
राज्यघटनेवरील ही चर्चा शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी या चर्चेला उत्तर देणार आहेत. या चर्चेत भाजपचे 12 ते 15 नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर नेते संविधानावर बोलणार आहेत.
Lok Sabha two day discussion on the Constitution
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- BMC elections : बीएमसी निवडणुकीसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिंदेंचं मोठे वक्तव्य, म्हणाले…
- One Nation One Election : विधेयकाला मोदी सरकारची मंजूरी, पण ते JPC कडे पाठवायची काँग्रेसची तयारी!!
- Dantewada : दंतेवाड्यात नक्षलवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, सात माओवादी ठार