वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शाश्वत विकासात केरळने पुन्हा बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी दुसरा क्रमांक मिळविला असून बिहारची कामगिरी वाईट ठरली आहे. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. Kerala Tops Again Bihar Last In NITI Aayog Sustainable Development Index
निति आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी गुरुवारी ‘शाश्वत विकास उद्दिष्टे’(एसडीजी)तिसरा एसडीजी निर्देशांक २०२० -२०२१ जारी केला. त्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या विकासाचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणविषयक मापदंडांवर मूल्यमापन केले जाते. यात ७५ गुणांसह केरळ अव्वलस्थानी राहिला. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी ७४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. बिहार, झारखंड आणि आसाम यांची कामगिरी सर्वाधिक वाईट राहिली आहे.
केंद्रशासित प्रदेशांत ७९ गुणांसह चंदीगड प्रथमस्थानी राहिले. ६८ गुण घेऊन दिल्ली दुसऱ्या स्थानी राहिली. २०२०-२१ मध्ये मिझोरम, हरयाणा आणि उत्तराखंड यांनी अनुक्रमे १२, १० आणि ८ गुणांची वाढ मिळवून कामगिरी सुधारणाऱ्या राज्यांत सर्वोच्च स्थान मिळविले.
भारताने ६ गुणांची सुधारणा
एकूण एसडीजी गुणांत भारताने ६ गुणांची सुधारणा केली आहे. २०१९ मध्ये भारताचे एकूण गुण ६० होते. ते २०२०-२१ मध्ये ६६ झाले आहेत. उद्दिष्ट-६ (शुद्ध पाणी व स्वच्छता) आणि उद्दिष्ट-७ (किफायतशीर व स्वच्छ ऊर्जा) यात चांगली सुधारणा झाल्याने ही गुणवाढ झाली आहे. या दोन्ही उद्दिष्टांत भारताला अनुक्रमे ८३ आणि ९२ गुण मिळाले आहेत.
फ्रंट-रनर श्रेणीत महाराष्ट्राला स्थान
२०१९ मध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची ‘फ्रंट-रनर’ अशी एक स्वतंत्र श्रेणी तयार केली होती. ६५ ते ९९ गुण असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा त्यात समावेश झाला होता. २०२०-२१ मध्ये ‘फ्रंट-रनर’ श्रेणीत आणखी १२ राज्ये समाविष्ट झाली. त्यात उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मिझोरम, पंजाब, हरयाणा, त्रिपुरा, दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, जम्मू व काश्मीर आणि लडाख यांचा समावेश आहे.
Kerala Tops Again Bihar Last In NITI Aayog Sustainable Development Index
महत्त्वाच्या बातम्या
- देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात, मुंबई ठरली देशात अव्वल
- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी थोपटली जवानांची पाठ, शस्त्रसंधीला १०० दिवस पूर्ण
- मनी मॅटर्स : कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय?
- इस्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची गच्छंती अटळ, सत्ता स्थापनेसाठी सर्व विरोधक एकत्र
- कॅनडात निवासी शाळेच्या जागेत २१५ मुलांचे सांगाडे, धर्मांतराप्रकरणी पोप यांनी माफी मागावी