• Download App
    पंजाबात तब्बल वीस हजार कोटींची वाळूचोरी – केजरीवाल यांचा चन्नींवर आरोप । Kejariwal targets Punjab Govt.

    पंजाबात तब्बल वीस हजार कोटींची वाळूचोरी – केजरीवाल यांचा चन्नींवर आरोप

    वृत्तसंस्था

    अमृतसर : पंजाबमध्ये आप सत्तेवर आल्यास अवैध वाळूउपसा थांबेल. वाळूचोरीचा पैसा राजकारण्यांच्या खिशात जाणार नाही, तर महिलांना कमाई होईल. त्यामुळेच पंजाबमधील नेते मला शिव्यांची लाखोली वाहत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्याविरुद्ध वाळूचोरीचे गंभीर आरोप आहेत. २० हजार कोटी रुपयांच्या वाळूची चोरी झाली आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. Kejariwal targets Punjab Govt.



    याप्रकरणी चौकशी करून प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) सादर केला जावा अशी मागणीही त्यांनी केली. चन्नी यांच्या चमकौर साहिब मतदारसंघात वाळूची अवैध खाण सापडल्याचे गेल्या काही दिवसांत मला आढळून आले. त्यांच्याच मतदारसंघात असे घडत असेल तर त्यांना कल्पना नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या अवैध खाणीचे मालक ते आहेत की त्यांची भागीदारी आहे की ते इतरांना अभय देत आहेत हे पंजाबला माहीत करून घ्यायचे आहे. अनेक मंत्री आणि आमदारांचे वाळूचोरीला अभय असल्याचे (आधीचे मुख्यमंत्री) कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच म्हटले होते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

    Kejariwal targets Punjab Govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न